१ डिसेंबर रोजी जवळपास १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार सरकार

KYC
मुंबई : १ डिसेंबर रोजी जवळपास १ कोटी गॅस कनेक्शन सरकार बंद करणार आहे. केवायसी म्हणजेच आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती ज्या लोकांनी अद्याप दिली नाही, यात त्यांचा समावेश होणार आहे. भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस या कंपन्यानाकेंद्र सरकारने केवायसी पूर्ण करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना यासाठी ३० नोव्हेंबरची शेवटची मुदत असेल.

आता देखील अनेक गॅस वापरणारे असे आहेत, ज्यांनी अजून देखील केवायसी दिली नाही. त्यांचे गॅस कनेक्शन सरकार बंद करणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीकडून केवायसी अंतर्गत, आधारकार्ड नंबर जमा न करणारे आणि ‘गिव इट अप’ स्किमसाठी केंद्र सरकारने लोकांची माहिती मागितली आहे.

तीन वर्षापूर्वीच सरकारने गॅस कनेक्शनला बॅंक खात्यासोबत जोडण्याची योजना सुरू केली होती. यामुळे सब्सिडीचा लाभ सरळ ग्राहकांना मिळणार आहे. ३ वर्ष होऊनही खूप लोकांनी केवायसी अपडेट केलेले नाही. ज्यांचे वार्षिक इनकम १० लाखांपेक्षा जास्त आहे, ते देखील सब्सिडीचा लाभ घेत आहेत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ १ कोटी गॅस ग्राहकांनी अजूनही आपले केवायसी अपडेट केलेले नाही. यात सर्वात जास्त दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश आहे.

Leave a Comment