एसबीआयचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध


मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे चूकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. अरुंधती भट्टाचार्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करतानाच म्हणाल्या, पीएएसयू बँकांनाही सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये.

सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या आश्वासनाला एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी विरोध केला आहे. अरुंधती भट्टाचार्य याबाबत म्हणाल्या, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून बँकांचे कर्ज चुकवण्याच्या जबाबदारीवर चुकीचा परिणाम होतो. शेतकरी कर्जमाफीमुळे पुन्हा निवडणुकीची वाट पाहत राहतील आणि कर्ज चुकवण्याऐवजी कर्ज माफ होण्याची वाट बघतील. जेव्हा सार्वजनिक क्षेत्रातील बँका डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारी मदतीची अपेक्षा करतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही शेतकऱ्यांसारखेच सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये आणि आपल्या ताकदीवरच सुधारणा करावी.

Leave a Comment