मुंबई : चिकनगुनियाचे थैमान दिल्लीसह राज्यातही सुरु झाले असून अनेक भागात डेंग्यूने देखील डोके वर काढले आहे. याबाबत योग गुरु बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे की, चिकनगुनिया झाल्यास तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. यासाठी प्रिवेंटिव उपाय केले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता.
बाबा रामदेव यांच्यामते चिकनगुनिया त्या लोकांना होतो ज्यांचे इम्यूनिटी सिस्टम कमजोर असते. या आजारामुळे ब्लड प्रेशर कमी होणे, प्लेटलेटची संख्या घटणे, लीव्हर वीक होने या सारख्या समस्या उद्भवतात. या आजारांपासून बचाव होण्यासाठी डाळिंब, पपईचे पाने, कोरफड याचे सेवन करा.
एकच डास चावल्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया होतो. हा डास फक्त चांगल्या पाण्यावरच येतात. यामुळे कोठेही पाणी जमा नका होऊ देऊ. बाबा रामदेव म्हणतात की, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे कमजोर लोकांनाच होतात. त्यामुळे खाणे चांगले आणि योग्य असले पाहिजे.