इंदूर- यंदाच्या वर्षात पाच ग्रहणे पाहण्याची संधी खगोलसंशोधक आणि अवकाशप्रेमींना आहे. परंतु त्यापैकी दोनच ग्रहणे भारतात दिसणार आहेत. ९ मार्चला खग्रास सूर्यग्रहण असून ईशान्येत ते अंशत: दिसणार असल्याचे उज्जैन स्थित जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्त यांनी सांगितले.
२३ मार्चला खंडग्रास चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार नाही. १८ ऑगस्टला एक खंडग्रास चंद्रग्रहण आहे तर १ सप्टेंबरला चक्राकार सूर्यग्रहण असून ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. मात्र आणखी एक खंडग्रास चंद्रग्रहण १६ सप्टेंबरला असून वर्षातील ती शेवटची अवकाशातील घटना असेल. ते भारतातील खगोलप्रेमींना पाहण्याची संधी आहे.