
शार्दुल ठाकूरला आयपीएल 2025 च्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी न केल्याने अनेक क्रिकेट तज्ञ आश्चर्यचकित झाले होते. शार्दुल ठाकूर हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असून तो कोणत्याही संघासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे बोलले जात होते, मात्र शुक्रवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या सर्व संघांचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. खरे तर केरळविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला एवढा फटका बसला की एक नकोसा विक्रम रचला गेला. शार्दुल ठाकूरने केरळविरुद्ध 4 षटकांत 69 धावा दिल्या आणि त्याचा संघ मुंबई 43 धावांनी पराभूत झाला.
Shardul Thakur : शार्दुल ठाकूरने एकट्याने दिल्या 2 गोलंदाजांच्या धावा, केला सर्वाधिक धुलाईचा विक्रम
शार्दुल ठाकूरने केरळविरुद्ध खराब गोलंदाजीच्या सर्व मर्यादा तोडल्या. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 4 षटकात 69 धावा दिल्या आणि त्याच्या गोलंदाजीत एकूण 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. शार्दुल ठाकूरने शेवटच्या षटकातच 3 षटकार आणि 1 चौकार दिले, परिणामी केरळ संघ 234 धावा करू शकला. शार्दुलची रोहित कुनुमल आणि सलमान नजीर यांनी सर्वाधिक धुलाई केली. कुनुमलने 87 धावांच्या खेळीत 7 षटकार ठोकले. तर सलमान नझीरने 99 धावांच्या नाबाद खेळीत 8 षटकार ठोकले.
मुंबईची बॅटिंग युनिट खूप मजबूत होती. संघात पृथ्वी शॉ, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे सारखे फलंदाज होते, पण तरीही संघ सामना हरले. शॉने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण हा खेळाडू 13 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. अंगक्रिशने 15 चेंडूत केवळ 16 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 32 धावांची खेळी केली. रहाणेने 35 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. मात्र तो बाद झाल्यानंतर सामना मुंबईच्या हाताबाहेर गेला.
