आजकाल खराब जीवनशैलीमुळे केस गळणे, कोंडा होणे, पांढरे होणे अशा समस्या उद्भवत आहेत. केसांशी संबंधित अशा अनेक समस्या तरुणांमध्ये दिसून येत आहेत. या समस्या केवळ आपल्या सौंदर्यावरच परिणाम करत नाहीत, तर आपल्या आत्मविश्वासावरही परिणाम करतात. तथापि, केस गळण्याची मुख्य कारणे हार्मोनल बदल, तणाव आणि आहाराचा अभाव आहे.
पातळ केस होतील दाट, आयुर्वेदातील हे 3 उपचार आहेत फायदेशीर, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
दाट केस येण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. काही जण रासायनिक उपचारही घेतात. तथापि, कधीकधी या उत्पादनांचे दुष्परिणाम देखील दिसून येतात. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की केसांची वाढ होण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय खूप फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया आयुर्वेदाच्या या सोप्या टिप्सबद्दल…
शिरोधारा
शिरोधारा ही पारंपारिक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. यामध्ये हळूहळू कपाळाला तेल लावले जाते. ताणतणाव कमी करण्यासोबतच केसांची मुळेही मजबूत होतात. मात्र, हे उपचार आयुर्वेद तज्ञाच्या देखरेखीखालीच करा. ज्या लोकांचे केस तणावामुळे गळतात, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
शिरो अभ्यंग
म्हणजे डोक्याला मालिश करणे. भृंगराज आणि आवळा यांसारख्या हर्बल तेलांनी डोक्याला मसाज केल्यास खूप फायदा होईल. यामुळे केसांना पोषण मिळते आणि मुळे मजबूत होतात. केसगळती नियंत्रित करण्यासाठी आठवड्यातून दोनदा भृंगराज किंवा आवळा तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा.
नस्य कर्म
हा नाकासंबंधित उपचार आहेत. यामध्ये अणु तेलाचा वापर केला जातो. नस्य शरीरातील दोष संतुलित करण्यास मदत करते. यामुळे केसही चांगले होतात. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोज सकाळी नाकात अणु तेलाचे 2 ते 3 थेंब टाका. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
यासोबतच व्हिटॅमिन बी12 आणि डीशी संबंधित गोष्टींचा आहारात समावेश करावा. केस मजबूत ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.