भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत असे काही घडल्यास विराट कोहलीवर होईल अन्याय, भारतीय दिग्गज खेळाडूचे मोठे विधान


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी अनेक प्रश्न आहेत, जसे- प्लेइंग इलेव्हन काय असेल? गिल खेळणार की नाही? गिल खेळला तर कोण बाहेर होईल? गिल खेळला नाही, तर भारताची फलंदाजी कशी असेल? अशा प्रश्नांदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर याने विराट कोहलीवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो म्हणाला की गिल न खेळल्यामुळे, विराटला पुन्हा तेच करावे लागले, जे त्याने गेल्या कसोटीत केले होते, तर तो त्याच्यावर थोडा अन्याय होईल.

आता प्रश्न असा आहे की संजय मांजरेकरांनी येथे मांडलेल्या अन्यायाचा मुद्दा काय? विराट कोहलीच्या फलंदाजीच्या स्थितीकडे लक्ष वेधण्याचा हा माजी भारतीय सलामीवीराचा हेतू आहे. विराट कोहली हा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. कसोटीत तो याच क्रमाने फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. पण, बंगळुरू कसोटीत शुभमन गिलच्या अनुपस्थितीत त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागले.

अशा परिस्थितीत गिलच्या गैरहजेरीत विराटने पुण्यातही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला उत्तर देताना संजय मांजरेकर म्हणाला की, त्याच्या मते हा विराट कोहलीवर अन्याय होईल. मांजरेकर म्हणाला की, विराटला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याऐवजी भारतीय संघ व्यवस्थापनाने त्या क्रमाने केएल राहुलला उतरवण्याचा विचार करावा.

न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत दोन्ही डावात 70 धावा केल्या. यामध्ये त्याला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. विराटने दुसऱ्या डावात 70 धावांची खेळी करताना सरफराजसोबतही उत्कृष्ट भागीदारी केली होती.

भारतीय संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडपेक्षा 0-1 ने पिछाडीवर आहे. बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाचे लक्ष आता पुण्यातील मालिकेत बरोबरी करण्याकडे लागले आहे. पुणे कसोटी सामना टर्निंग ट्रॅकवर खेळवला जाईल, असे मानले जात आहे.