चांगले झाले, बाबर आझमची हकालपट्टी झाली, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने पीसीबीच्या निर्णयाचे केले स्वागत


बाबर आझमला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तो संघाचा भाग असणार नाही. पीसीबीच्या नवीन निवड समितीने बाबर आझमची खराब कामगिरी पाहता त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. बाबरला वगळण्याच्या पीसीबीच्या निर्णयावरून पाकिस्तानी संघ दोन भागात विभागला गेला आहे. कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्यासह पाकिस्तानचे अनेक खेळाडू या निर्णयावर नाराज आहेत. बाबर आझमला वगळण्याच्या निर्णयावर पाकिस्तान संघाबाहेर बसलेल्या क्रिकेटपटूंनीही पीसीबीवर हल्लाबोल केला आहे. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू पीसीबीवर खूश नसले, तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रॅड हॉगला वाटते की पीसीबीने जे काही केले, ते चांगलेच केले.

ब्रॅड हॉगवर विश्वास ठेवला, तर तो पीसीबीवर खूश असल्याचे दिसते. बाबर आझमला संघातून काढून टाकण्यात आले, हे चांगले झाले. ब्रॅड हॉगनेही हे म्हणण्यामागची कारणमीमांसा दिली, जे बाबरची विराटशी तुलना करून त्याचा बचाव करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर आहे.


ब्रॅड हॉगने एक्स हँडलवर सांगितले की, विराट कोहली खराब फॉर्ममध्ये असतानाही टीम इंडिया सामने जिंकत होती. त्यानंतरही, ते सर्वाधिक विजयी टक्केवारीसह दुसरा सर्वोत्तम संघ राहिला. बाबर आझम वाईट टप्प्यातून जात असताना, पाकिस्तान संघ सर्वात वाईट विजयाची टक्केवारी असलेला दुसरा संघ आहे. साहजिकच विजयाची टक्केवारी खराब असताना कठोर निर्णय घ्यावे लागतात. बाबर आझमला वगळून पीसीबीनेही तेच केले आहे.


बाबर आझमने 2023 पासून 17 डावांमध्ये 20.71 च्या सरासरीने 352 धावा केल्या आहेत. त्याच्या खराब कामगिरीमुळे पीसीबीने त्याला वगळण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयावर अनेक पाकिस्तानी खेळाडूंची वृत्ती संतप्त आहे. फखर जमान म्हणाला की, जेव्हा विराट वाईट टप्प्यातून जात होता. त्याची सरासरी 19.33 असतानाही टीम इंडियाने त्याला बेंचवर बसवले नाही. त्यांच्या सर्वोत्तम फलंदाजाला वगळल्याने संघाच्या मनोबलावर वाईट परिणाम झाला आहे.

बाबर आझमला संघातून वगळल्यानंतर, 2016 मध्ये पदार्पण केल्यानंतर ही दुसरी आणि जून 2018 नंतर पहिलीच वेळ असेल. जेव्हा पाक संघ त्याच्याशिवाय कोणतीही कसोटी खेळताना दिसणार आहे.