150 कोटींमध्ये बनलेला हा कन्नड चित्रपट आलिया भट्टच्या ‘जिगरा’ची घेणार परीक्षा, होणार मोठी टक्कर


आलिया भट्ट पहिल्यांदाच एका चित्रपटात ॲक्शन अवतारात दिसणार आहे. आलिया नेहमीच रोमँटिक, कॉमेडी आणि गंभीर चित्रपट करते. पण यावेळी चाहत्यांना ती मोठ्या पडद्यावर ॲक्शन करताना पाहायला मिळणार आहे. तिचा जिगरा हा चित्रपट याच महिन्यात 11 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे. मात्र बॉक्स ऑफिसवरचा हा मार्ग आलियासाठी सोपा असणार नाही. आलियाचा हा चित्रपट सोलो प्रदर्शित होत नाहीये. जिगरासोबतच मार्टिन हा कन्नड ॲक्शनपटही मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मार्टिनमध्ये कन्नड अभिनेता ध्रुव सरजा मुख्य भूमिकेत आहे. ध्रुवला दक्षिणेचा ॲक्शन प्रिन्स म्हटले जाते. त्याच्या चित्रपटाच्या पहिल्या झलकमध्ये तो मार्टिनमध्ये दमदार ॲक्शन करताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यशचा मार्टिन हा कन्नड इंडस्ट्रीतील KGF फ्रेंचायझीनंतरचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. अहवालानुसार, सुमारे 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा तयार करण्यात आला आहे.

मात्र, ‘मार्टिन’ आलियाच्या टॅलेंटला हिंदीत टक्कर देऊ शकेल की नाही हे सांगणे घाईचे आहे. याचे कारण म्हणजे ध्रुव सरजा इतर साऊथ स्टार्सप्रमाणे हिंदी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध नाही. मात्र, चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले आणि लोकांनी माऊथ मार्केटिंग केले, तर चित्रपट दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगली कमाई करू शकतो. त्यामुळे मार्टिन हिंदीत प्रदर्शित होत असला, तरी त्यामुळे जिगराचे मोठे नुकसान होईल असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

चाहत्यांना आलिया भट्टच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझरही खूप आवडला आहे. या चित्रपटात आलिया एका बहिणीची भूमिका साकारत आहे, जी आपल्या भावाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते. या चित्रपटात वेदांग रैना आलियाच्या भावाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट वासन बाला यांनी दिग्दर्शित केला असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे.

ध्रुव सरजाचा मार्टिन कन्नडसह 6 भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. तो हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होत आहे. ट्रेलरवरून हे स्पष्ट होते की मार्टिन कन्नड इंडस्ट्रीला KGF फ्रँचायझी आणि कांतारा सारख्या मोठ्या उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. ध्रुवशिवाय अन्वेशी जैन, वैभवी शांडिल्य, सुकृता वागळे, चिकन्ना आणि साधू कोकिला हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एपी अर्जुन यांनी केले आहे.