सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत 53 औषधे नापास झाली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेह आणि जीवनसत्त्वांसाठी काही औषधांचाही समावेश आहे. सीडीएससीओच्या अयशस्वी झालेल्या औषधांमध्ये वेदना कमी करणारे औषध डायक्लोफेनाक, ताप कमी करणारे औषध पॅरासिटामॉल, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधे यांचा समावेश आहे. ही औषधे देशातील अनेक मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात. ही औषधे गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी ठरली असून, ती आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
पॅरासिटामॉल टॅब्लेटसह 50 हून अधिक औषधे चाचणीत अयशस्वी, ही आहे यादी
48 औषधांची यादी जाहीर केली असली, तरी सीडीएसओच्या चाचणीत 53 औषधे अपयशी ठरली आहेत. कारण 5 औषधे बनवणारी कंपनी हे त्यांचे औषध नसल्याचे सांगत आहे. त्यांच्या कंपनीच्या नावानेच बनावट औषधे बाजारात विकली जात आहेत. अयशस्वी झालेल्या औषधांपैकी सन फार्मा द्वारे निर्मित Pantocid टॅब्लेटचा देखील समावेश. बरेच लोक हे औषध वापरतात आणि गेल्या काही वर्षांत त्याचा वापरही वाढला आहे, परंतु हे औषध देखील चाचणी उत्तीर्ण झाले नाही.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या – उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेलकल आणि पल्मोसिल इंजेक्शन देखील चाचणी अयशस्वी झाले. अल्केम हेल्थ सायन्सचे अँटीबायोटिक क्लॅव्हम 625 औषध चाचणीत अयशस्वी झाले. तथापि, काही फार्मास्युटिकल कंपन्यांनी असा दावा केला आहे की सीडीएसओने चिन्हांकित केलेल्या औषधांच्या बॅचेस बनावट आहेत आणि त्या त्यांनी तयार केलेल्या नाहीत.
केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेस, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, सेल्युलेज, लिपेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, माल्ट डायस्टेस, invertase आणि papain यांच्या वापरापासून लोकांना धोका असल्याची शंका आहे. अयशस्वी झालेल्या औषधांमध्ये केसांच्या उपचारांसाठी अँटीपॅरासिटिक औषधांचा समावेश आहे. सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारने 156 फिक्स्ड डोस औषधांवर बंदी घातली होती. ती औषधे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर औषध सल्लागार मंडळाच्या शिफारशींनंतर सरकारने हा निर्णय घेतला होता. फिक्स्ड डोस औषधे म्हणजे FDC ही अशी औषधे आहेत, ज्यात एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात, ती घेतल्याने त्वरित आराम मिळतो.