
1987 साली ‘आज’ चित्रपटात केवळ 17 सेकंदांची भूमिका साकारली होती. तेव्हा अभिनेता एवढे मोठे व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येईल हे कुणालाच माहीत नव्हते. तथापि, या 17 सेकंदांच्या भूमिकेमागे त्याने घेतलेली मेहनत फार कमी लोकांना माहिती असेल. येथे आम्ही बोलतोय बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणून नाव कमावणाऱ्या अक्षय कुमारबद्दल. चित्रपटसृष्टीत येण्याचे स्वप्न पाहण्यापूर्वी तो राजीव ओम भाटिया या नावाने ओळखले जात होता. चित्रपटांसाठी त्याने खूप संघर्ष केला होता.
Akshay Kumar Birthday: 1500 रुपयांसाठी वेटर बनला, शिपायाचीही नोकरी केली, आज अक्षय कुमार आहे 2500 कोटींचा मालक
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार मुंबईत मार्शल आर्ट इन्स्ट्रक्टर होता, त्याआधी त्याने कोलकात्यात एका ट्रॅव्हल कंपनीत शिपायाचे कामही केले होते. अलीकडेच एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या प्रवासाविषयी सांगितले. चला तर मग जाणून घेऊया की अक्षय कुमारने प्रसिद्धीसाठी किती काळ प्रवास केला आहे…. अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसरमधील पंजाबी कुटुंबात झाला असला, तरी तो दिल्लीत लहानाचा मोठा झाला होता. अक्षयला लहानपणापासूनच अभिनय आणि मार्शल आर्टची आवड होती, त्यासाठी त्याने लहानपणापासूनच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
अक्षय बँकॉकलाही गेला आहे, जिथे त्याने ‘मय थाई’ शिकली आणि तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला. त्याच काळात त्याने एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले, त्या रेस्टॉरंटचे नाव होते मेट्रो गेस्ट हाऊस, तिथे त्याचा सुरुवातीचा पगार होता फक्त 1,500 रुपये. मुंबईतील एका मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करण्यास सुचवल्यानंतर अक्षय कुमारची गोष्ट बदलली. यानंतर, सर्वप्रथम त्याने आपले नाव राजीव वरून बदलून अक्षय केले आणि नंतर त्याचा पोर्टफोलिओ शॉट घेतला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यांदा त्याचे फोटोशूट झाले होते त्याच ठिकाणी आज त्याने आपले घर बांधले आहे.
खूप मेहनतीनंतर त्याला ‘आज’मध्ये 17 सेकंदांसाठी कराटे ट्रेनरची भूमिका मिळाली. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली, नंतर त्याला बंगळुरुमध्ये रॅम्प वॉक करण्याची ऑफर मिळाली, ज्यासाठी त्याला 6 वाजता फ्लाइट पकडायची होती. अक्षय सकाळी 6 च्या ऐवजी संध्याकाळी 6 ची फ्लाईट असल्याचा विचार करू लागला, त्यामुळे त्याची फ्लाइट चुकली. त्याच्या चुकीला अव्यावसायिकता म्हटले गेले. यानंतर तो नटराज स्टुडिओला भेट देऊ लागला, तिथे अक्षयने प्रमोद चक्रवर्ती कंपनीचे मेकअप आर्टिस्ट नरेंद्र भेटला, ज्याने त्याचा फोटो फिल्ममेकर प्रमोदला दाखवला. प्रमोदला अक्षयचा फोटो इतका आवडला की त्याने त्याला त्याच्या पुढच्या ‘दीदार’ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी साइन केले आणि त्याला 5,000 रुपयांचा चेकही दिला.
अक्षय राजेश खन्ना यांच्या ‘जय शिव शंकर’ या चित्रपटाच्या ऑडिशनलाही गेला होता, पण तिथे त्याला ऑडिशनची संधी मिळाली नाही. त्याने पहिला ‘दीदार’ साइन केला, पण त्याचा पहिला रिलीज झालेला ‘सौगंध’ होता. ‘फूल और कांटे’साठी अक्षयला निर्मात्यांची पहिली पसंती होती, मात्र जास्त मागणीमुळे ही भूमिका अजय देवगणला देण्यात आली. यानंतर त्याने ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘हेरा फेरी’ आणि त्याचा सिक्वेल ‘फिर हेरा फेरी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यशस्वी करिअर केल्यानंतर, 2001 मध्ये त्याने अभिनेता राजेश खन्ना-डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी लग्न केले.
