
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या छोट्या टप्पूचा खोडसाळपणा आजही लोकांना आठवतो. 9 वर्षे अभिनेता भव्य गांधी याने ‘टप्पू’ची भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जेव्हा त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शोचे अनेक चाहते त्याच्या निर्णयावर नाराज झाले. सोनी सब टीव्हीचा हा प्रसिद्ध शो सोडल्यानंतर भव्यने छोट्या पडद्यापासून दुरावला होता. आता 7 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा सोनी सब टीव्हीच्या शोमध्ये प्रवेश करत आहे. पण यावेळी तो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नाही, तर ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये दिसणार आहे.
TMKOC : आता प्रेम नाही, द्वेष पसरवणार… 7 वर्षांनंतर टीव्हीवर परतणार आहे टप्पू
भव्य जेडी मजिठियाच्या ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. याचाच अर्थ यावेळी लोकांना हसवणारा ‘टप्पू’ लोकांना तिरस्कार करताना दिसणार आहे. भव्य गांधीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ सकारात्मक भूमिका केल्या आहेत. पण यावेळी तो एका वेड्याची भूमिका साकारणार आहे. हे एक ग्रे शेडवाले पात्र असेल, जे पूर्णपणे सायको असेल. आता हा सायको पुष्पा आणि तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कसा प्रयत्न करतो आणि पुष्पा तिच्या कुटुंबावर आलेल्या या संकटाचा सामना कसा करतेस, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
2017 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला निरोप दिल्यानंतर भव्य गांधी गुजराती चित्रपटांकडे वळला होता. भव्यने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘पप्पा तमने नही समझे’ या गुजराती चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर त्याने बाप धमाल डीक्रो कमाल, बाऊ ना विचार, तारी साथे, कहवतलल परिवार यांसारख्या अनेक गुजराती चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
Hero ❤️ pic.twitter.com/giVtVQ55Vd
— Bhavya Vinod Gandhi (@bhavyagandhii) May 25, 2021
अलीकडेच, भव्य गांधीने एका मुलाखतीत सांगितले की, वयाच्या 10 व्या वर्षी, त्याने ‘तारक मेहता…’ला अलविदा करण्यापूर्वी 9 महिन्यांचा नोटिस पिरियड दिला होता. तो म्हणाला की त्याला त्याच्या भविष्याची खूप काळजी वाटत होती. वैयक्तिक वाढीची चिंता त्याला शांत झोपू देत नव्हती आणि त्यामुळेच त्याने ‘तारक मेहता…’ सारखा प्रसिद्ध शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. सहसा, कोणताही शो सोडण्यापूर्वी, अभिनेत्याला निर्मितीसाठी तीन महिन्यांचा नोटिस कालावधी देण्यासाठी सूचित केले जाते. पण त्याच्या गोंधळामुळे भव्यने या शोमध्ये पूर्ण 9 महिने काम केले.
भव्य याच्यानंतर राज अनडकटने त्याची जागा घेतली. राज 5 वर्षे या शोसोबत होता. 5 वर्षांनंतर, राजने देखील त्याच्या वैयक्तिक वाढीचे कारण सांगून शो सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये राज गेल्यानंतर नितीश भुलानी याची टप्पूच्या भूमिकेसाठी निवड झाली. नितीश हा या शोचा तिसरा टप्पू आहे.
