19 षटकारांसह ठोकले हाहाकारी शतक, गौतम गंभीरच्या ‘चेल्याने’ उभारली सर्वात मोठी धावसंख्या


सध्या दिल्लीत DDCA ची T20 स्पर्धा, दिल्ली प्रीमियर लीग खेळली जात आहे आणि या लीगमध्ये अनेक अज्ञात खेळाडूंनी आपल्या धमाकेदार कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता या लीगमधील सर्वात स्फोटक खेळी देखील पाहायला मिळाली आहे, जी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या चेल्याच्या बॅटमधून आली आहे. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्समध्ये आपल्या छोट्या पण वेगवान खेळीने आपला ठसा उमटवणारा दिल्लीचा फलंदाज आयुष बडोनीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि डीपीएलमधील सर्वात मोठी आणि स्फोटक खेळी खेळून खळबळ उडवून दिली. ज्यामध्ये एका डावात त्याच्या बॅटमधून 19 षटकारांचा पाऊस पडला.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शनिवारी अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. दक्षिण दिल्ली आणि उत्तर दिल्ली यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आयुष बडोनीच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रत्येक सामन्याप्रमाणेच पुन्हा एकदा सलामीवीर प्रियांश आर्यने येताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्याचे सहकारी सलामीवीर झटपट बाद झाले, पण त्यानंतर कर्णधार बडोनीने आपल्या बॅटने आक्रमण करण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून 286 धावांची अप्रतिम भागीदारी केली आणि उत्तर दिल्लीच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केला.

सध्या अशी खेळी खेळणाऱ्या बडोनीबद्दल बोलूया, जे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते, पण टी-२० क्रिकेटमध्ये असे करणे सोपे नाही. बडोनी येताच त्याने धडाकेबाज फलंदाजी करत षटकार ठोकले. काही वेळातच बडोनीने स्पर्धेतील पहिले शतक पूर्ण केले. यानंतर त्याचे आक्रमण थांबेल, असे उत्तरच्या गोलंदाजांना वाटले असेल, पण येथून पुढे ता आणखी आक्रमक झाला आणि त्याने 150 धावाही पूर्ण केल्या. अखेरीस, 55 चेंडूत 165 धावांची विनाशकारी खेळी खेळल्यानंतर बडोनी 19व्या षटकात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या काळात त्याच्या बॅटमधून 19 षटकार आणि फक्त 8 चौकार आले आणि स्ट्राईक रेटही 300 होता. अशा प्रकारे त्याने या लीगमधील सर्वात मोठ्या खेळीचा विक्रमही केला.

बडोनीच नाही, तर प्रियांशनेही आपले धमाकेदार शतक पूर्ण केले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. त्याने अवघ्या 50 चेंडूत 10 चौकार आणि 10 षटकारांसह 120 धावा केल्या. विशेष म्हणजे प्रियांशने एकाच षटकात सलग 6 षटकार मारण्याचा चमत्कारही केला. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो युवराज सिंगनंतर दुसरा भारतीय ठरला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण दिल्लीने 20 षटकांत 308 धावांपर्यंत डोंगराएवढी धावसंख्या उभारली. हा संघ टी-20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे.