गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्याने हार्दिक पांड्या अडचणीत? येणारे दिवस चांगले नाहीत!


हार्दिक पांड्या…या खेळाडूने टीम इंडियाला 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पांड्याने बॉल आणि बॅटने चमत्कार दाखवून भारताला विश्वविजेते बनवले, या खेळाडूने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 3 मौल्यवान विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताने 17 वर्षानंतर टी-20 विश्वचषक जिंकला. मात्र आता हा खेळाडू अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. पांड्याचे येणारे दिवस चांगले नसतील, असे मानले जात असून याचे कारण नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, माझा विश्वास आहे की जर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळू शकत असाल, तर तुम्ही ते नक्कीच खेळले पाहिजेत. गंभीर म्हणाला, ‘मी दुखापती व्यवस्थापन संघातील नाही. जर तुम्हाला दुखापत झाली असेल, तर तुम्ही जा आणि बरे व्हा. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असाल, तर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजे. कोणत्याही गोलंदाजाला लाल चेंडू किंवा पांढऱ्या चेंडूत विशेषज्ञ म्हणायचे नाही.

गंभीर पुढे म्हणाला की, त्याला असा कोणताही खेळाडू नको आहे, ज्याला त्याने फक्त कसोटीसाठी ठेवावे किंवा त्याला फक्त एकदिवसीय किंवा टी-20 साठी खेळावे. मी कोणत्याही खेळाडूचा वर्कलोड मॅनेज करण्याच्या बाजूने नाही. गंभीर म्हणाला की, व्यावसायिक क्रिकेटपटूची कारकीर्द लहान असते, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त खेळले पाहिजे. खेळाडूने तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आता हार्दिक पांड्याला कसोटी फॉर्मेट खेळायला भाग पाडणार का, हा प्रश्न आहे. हार्दिक पांड्या हा वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये मॅचविनर आहे, पण दुखापतींच्या भीतीमुळे तो टेस्ट क्रिकेट खेळत नाही. 2018 मध्ये हार्दिकने शेवटची कसोटी खेळली होती. पण आता टीम इंडियासाठी त्याला तिसरा फॉरमॅटही खेळावे लागणार असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाने गेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हार पत्करली आहे आणि गौतम गंभीरला हा पराभव कधीही हॅट्ट्रिक होऊ द्यायचा नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला संधी मिळाल्यास तो पांड्याला कसोटी खेळण्यास नक्कीच सांगू शकतो.