Bike Maintenance : बाईक सुरू व्हायला लागतो का वेळ? लक्षात ठेवा या गोष्टी


उन्हाळ्यात बाइकमध्ये अनेक समस्या दिसू लागतात, त्यामुळे बाईक सुरू होण्यास वेळ लागतो. यामागे काही कारणे आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुमची बाईक जास्त काळ चालू शकेल आणि प्रवासादरम्यान फसवणूक होणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तुमचा प्रवास सुरू ठेवू शकाल.

बहुतेक लोक मोकळ्या जागेत बाईक पार्क करतात. त्यामुळे बाइकचा प्रत्येक भाग प्रभावित होतो. अशा स्थितीत बाईकच्या आवश्यक भागांपैकी एक असलेल्या बॅटरीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुमच्या बाईकची बॅटरी वेळोवेळी तपासा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास लगेच दुरुस्त करा.

वास्तविक, जे बाईक प्रेमी आहेतस, ते त्यांच्या बाईकची उत्तम देखभाल करतात. पण तरीही अनेक वेळा काही गोष्टी अशाच राहतात, ज्यांची काळजी न घेतल्यास मोठ्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, बाइकच्या एअर फिल्टरकडे थोडेसे लक्ष दिले जाते, परंतु जर एअर फिल्टर घाण असेल आणि वेळेवर बदलला नाही, तर त्याचा बाइकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे बाईकची सरासरीही बिघडते.

इंजिन ऑइल हे वाहनासाठी सर्वात महत्वाचे असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बाइकसाठी योग्य इंजिन ऑइल निवडणे महत्त्वाचे आहे. मॅन्युअल तपासा आणि तुमच्या वाहनासाठी योग्य दर्जाचे इंजिन ऑईल वापरा. बाईकचे ऑईल योग्य वेळी बदलले नाही, तर त्याचा इंजिनवर विपरीत परिणाम होतो. इंजिन ऑइल ल्युब्रिकेशनचे काम करते. ते इंजिनच्या प्रत्येक भागाला स्वच्छ आणि संरक्षित करते. अशा परिस्थितीत वेळोवेळी इंजिन ऑईल तपासत राहा आणि आवश्यक असल्यास ते बदलून घ्या.

बाईकचा स्पार्क प्लग स्वच्छ नसेल, तर बाईक सुरू करताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यासाठी दुचाकी दोन ते तीन हजार किलोमीटर चालल्यानंतर स्पार्क प्लग स्वच्छ करून घ्या.