Sachin Tendulkar’s Birthday : …जेव्हा सचिन तेंडुलकरच्या एका कृतीने उडवली होती सौरव गांगुलीची झोप


भारतीय क्रिकेटने आपल्या प्रदीर्घ इतिहासात अनेक भागीदारी पाहिल्या आहेत, मैदानावर अनेक भागीदारी पाहिल्या आहेत, परंतु त्यापैकी फक्त काही अशा आहेत की त्या मैदानाबाहेर जितक्या शक्तिशाली होत्या, तितक्याच मैदानाच्या आतही होत्या. महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ही अशी जोडी आहे, ज्यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांना केवळ अनेक अविस्मरणीय क्षणच दिले नाहीत, तर एकमेकांसोबत अनेक आश्चर्यकारक आठवणीही शेअर केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत, ज्यामुळे सौरव गांगुलीची झोप उडाली होती.

भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी 1990 आणि 2000 च्या दशकात तेंडुलकर-गांगुली भागीदारी खूप जवळून पाहिली. दोघांनी मिळून खूप धावा केल्या, अनेक शतकी भागीदारी केली आणि चाहत्यांनीही त्याचा खूप आनंद घेतला. या दोन्ही महान खेळाडूंनी खेळपट्टीवर एकमेकांच्या सहवासाचा खूप आनंद लुटला, म्हणूनच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्यामध्ये 26 वेळा शतकी भागीदारी झाली. ही भागीदारी टीम इंडियामध्ये सामील झाल्यानंतर सुरू झाली नाही, तर अनेक वर्षांपूर्वी जेव्हा दोघे शालेय स्तरावर क्रिकेट खेळत होते.

शालेय जीवनापासून सचिन खूप हिट झाला होता आणि त्याच्या चर्चा वर्तमानपत्रात येऊ लागल्या. त्याचवेळी सौरव गांगुलीही हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत होता. दोघांची पहिली भेट याच सुरुवातीच्या काळात झाली, जेव्हा ते कानपूरमधील एका स्पर्धेत एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आणि त्यानंतर इंदूरमधील BCCI अंडर-15 कॅम्पमध्ये त्यांची मैत्री सुरू झाली. आता सचिन लहानपणी किती ड्यॅम्बिस होता याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या कारनाम्याचे उदाहरण या शिबिरात पाहायला मिळाले आणि गांगुली त्याचा बळी ठरला.

सचिनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो आणि त्याचे मुंबई क्रिकेट संघातील सहकारी जतीन परांजपे आणि केदार गोडबोले यांनी असे काही केले, ज्यामुळे गांगुलीला रात्री झोपच लागली नाही. सचिनने सांगितले की, एकदा शिबिराच्या वेळी गांगुली दुपारी त्याच्या खोलीत झोपला होता. अशा स्थितीत सचिन, परांजपे आणि गोडबोले यांनी खोडसाळ विचार करून गांगुलीची खोली पाण्याने भरली. त्यानंतर गांगुली अचानक जागा झाला आणि त्याला त्याच्या आजूबाजूला फक्त पाणीच दिसले. त्याचे सामान पाण्यात तरंगत होते आणि त्याला काय करावे सुचत नव्हते.

मात्र, हा खोडसाळपणा सचिन आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांची असल्याचे गांगुलीला नंतर कळले. येथूनच त्यांची मैत्री सुरू झाली, जी आजतागायत कायम आहे. यानंतर लगेचच सचिनने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी भारताकडून कसोटी पदार्पण केले. सचिनने 1989 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर कराची कसोटीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जी 24 वर्षांनंतर 2013 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संपली. या 24 वर्षात सचिनने तिन्ही फॉरमॅटमध्ये 664 सामने खेळले आणि विक्रमी 34357 धावा केल्या. यामध्ये शतकांची शतके म्हणजेच 100 शतके त्यांच्या नावावर आहेत. त्याने 201 विकेट्सही घेतल्या.