खाऊ नका छोले भटुरे, दाल माखणी.. उत्तर भारतीय अन्नात पोषणाचा अभाव, अभ्यासात खुलासा


भारतातील बहुतेक लोकांना मसालेदार पदार्थ आवडतात. यासाठी उत्तर भारतातील खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत. जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक घरात विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. असेही म्हटले जाते की हे घरी शिजवलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या फूड प्लेटमध्ये प्रथिनांसह सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश असावा. यासाठी लोक त्यांच्या आहारात उच्च प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करतात. पण असे अनेक पोषक तत्व आहेत, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत. अलीकडेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, उत्तर भारतीय अन्न आवश्यक प्रमाणात पोषण देत नाही.

चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) च्या सहकार्याने जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी एक अभ्यास केला आहे. या संशोधनात 400 लोकांचा समावेश करण्यात आला होता, एक गट निरोगी लोकांचा होता आणि दुसरा प्राथमिक अवस्थेत किडनीचे आजार असलेल्या रुग्णांचा गट होता.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अन्नामध्ये सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीच्या तीव्र आजारांसह असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.

अभ्यासाचे प्रमुख लेखक प्रोफेसर विवेकानंद झा यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील लोक विविध प्रकारचे पदार्थ खातात, त्यामुळे जुनाट आजारांपासून बचाव करण्यासाठी शरीराला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

तसेच, या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये असे म्हटले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पोषक तत्वांचे सेवन जास्त असल्याचे दिसून आले आहे. पण उत्तर भारतीयांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.

यासोबतच जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनामुळे हाय बीपी, हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, प्रथिनांचे सेवन कमी झाल्याचे आढळले आहे.

NCDs रोखण्यासाठी, संशोधकांनी भारतीय आहारातील चांगल्या पोषणासाठी काही सूचना शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये मीठ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे समाविष्ट आहे. आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो.