‘कोहली आला तर…’, तिसऱ्या सामन्यापूर्वीच घाबरला इंग्लंड


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत मोठा विजय मिळवला. आता तिसऱ्या कसोटीला मोठा ब्रेक मिळाला आहे, हा सामना खास असेल, कारण किंग विराट कोहली टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. भारतीय चाहते जितकी विराट कोहलीची वाट पाहत आहेत, तितकीच भीती इंग्लंडच्या कॅम्पमध्येही आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने म्हटले आहे की, जेव्हा विराट कोहली तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात परतेल, तेव्हा शेवटच्या सामन्यांमध्ये आपल्याला भारतीय संघाचा क्रूर फॉर्म मैदानावर पाहायला मिळेल, जो पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत नव्हता.

एवढेच नाही, तर नासिर हुसेन असाही म्हणाला की, विराट कोहली परतल्यावर आम्हाला मैदानावर एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल, ज्याची आम्ही वाट पाहत होतो. नासिरने जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील लढतीबद्दलही सांगितले आणि म्हटले की ही लढाई पाहण्याची ही शेवटची संधी आहे.

विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून सुट्टी घेतली होती, तो सध्या लंडनमध्ये आहे. विराट कोहली दुस-यांदा बाप होणार आहे, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यापासून टीम इंडियात सामील होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे, जरी शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

या मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर हैदराबादमध्ये टीम इंडियाने पहिला सामना हरला होता, त्यानंतर टीमवर टीका झाली होती. मात्र, विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवली आहे.