का साजरी केली जाते मौनी अमावस्या? या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घ्या


हिंदू धर्मात मौनी अमावास्येला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी व्यक्तीने मौन बाळगले पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे. यावेळी मौनी अमावस्या 9 फेब्रुवारीला येणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला, म्हणून मौनी शब्दाची उत्पत्ती मुनी शब्दापासून झाली असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृता समान बनते. या दिवशी देवता गंगेच्या पाण्यात वास करतात. शास्त्रानुसार मनाचा देव चंद्रदेव आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते.

का साजरी केली जाते मौनी अमावस्या ?
मौनी अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. यवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्यात मकर राशीत चंद्र आणि सूर्य एकत्र येतात, तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या उर्जेच्या प्रभावामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता आणि धर्माचा कारक मानला जातो, म्हणून जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत एकत्र येतात, तेव्हा मौनी अमावस्या साजरी केली जाते. यामुळे या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी लाभ होतो.

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे?
मौनी अमावस्येला स्नान केल्यानंतर तीळ, तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, कपडे इत्यादी दान करावे. या दिवशी गरीब, साधू, महात्मा आणि ब्राह्मण यांना अन्नदान करा आणि त्यांना लोकरीचे कपडे जसे ब्लँकेट इत्यादी दान करा. या दिवशी गुळात काळे तीळ मिसळून लाडू बनवावेत आणि ते लाल कपड्यात बांधून दान करावे. या दिवशी स्नान आणि दान इत्यादी व्यतिरिक्त पितृ श्राद्ध देखील करावे.

मौनी अमावस्येला महिलांनी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी. शास्त्रानुसार या दिवशी नर्मदा, कावेरी, गंगा, सिंधू आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. असे केल्याने अनेक दोष दूर होतात.

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये?
मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ करताना काहीही बोलू नये आणि आंघोळीपूर्वी गप्प राहावे. घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नका. या दिवशी भांडणे व वाद टाळावेत. या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका किंवा कडू बोलू नका. या दिवशी अंगाला तेल लावू नये तसेच तेलाने मसाज करू नये.

मौनी अमावस्येचे व्रत करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा मेकअप करू नये. या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळा आणि तामसिक आहार घेऊ नका. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. अमावस्येला निर्जन स्थळे, कब्रस्तान, स्मशानभूमी इत्यादी जवळ जाऊ नका.