लोखंडी अंगठी घालण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, अन्यथा उद्भवू शकतात समस्या


हिंदू धर्मात जेव्हा जेव्हा लोकांच्या जीवनात अनेक समस्या येतात किंवा त्यांच्या जीवनात कोणतीही संकटे येतात, तेव्हा प्रत्येक व्यक्ती देवाचे स्मरण करू लागतो. हिंदू धर्मात कुंडली आणि भाग्य याला अधिक महत्त्व दिले जाते. कुंडली आणि भविष्य दोन्ही ग्रहांच्या स्थितीवर आणि हालचालींवर अवलंबून असतात. जर ग्रह योग्य दिशेत आणि स्थितीत असेल, तर एखाद्या व्यक्तीचे नशीब नेहमी त्याला साथ देत असते आणि जर नशीब त्याला साथ देत नसेल, तर समजून घ्या की कोणता ना कोणता ग्रह तुमच्यासाठी कमजोर होत आहे. त्याला शांत करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता.

कुंडलीत शनीची स्थिती वाईट असते किंवा शनिदेवाचा प्रकोप व्यक्तीवर असतो, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सामान्यतः कठीण प्रसंग येतात. त्याचप्रमाणे राहू-केतू हे देखील असे ग्रह आहेत, जे व्यक्तीच्या जीवनात कठीण प्रसंग आणतात. ज्योतिष शास्त्रामध्ये या ग्रहांना शांत करण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी उपाय देखील सांगण्यात आले आहेत. असाच एक उपाय म्हणजे बोटात लोखंडी अंगठी घालणे. जो तुमच्या ग्रहांच्या शांतीसाठी चांगला उपाय ठरू शकतो.

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक धातूचे विशेष महत्त्व सांगितले आहे. शास्त्रात लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. शनिदोष दूर करण्यासाठी अनेकजण घोड्याच्या नालेची अंगठी बनवून ती घालतात. पण लोखंडी अंगठी कधी आणि कशी घालायची? याबद्दल देखील जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

ज्या दिवशी तुम्ही लोखंडी अंगठी घालाल त्या दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि शनिदेवाच्या बीज मंत्राचे पठण करुन ती परिधान करावी. याशिवाय पुरुषांनी उजव्या हाताच्या मोठ्या बोटात आणि महिलांनी डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी.

मधल्या बोटाला शनीचे बोट म्हणतात. जर तुम्ही शनीची वक्रदृष्टी, साडेसाती, शनीची महादशा, राहू किंवा केतूची महादशा सुरु असेल, लोखंडी अंगठी त्याचा प्रभाव कमी करते. यासोबतच लोखंडाची अंगठी कोणत्याही प्रकारच्या दृष्टीदोषापासून तुमचे रक्षण करते.