186 विकेट घेणाऱ्या गोलंदाजावर बाबर आझमचा नव्हता विश्वास, विश्वचषकात मागितली गोलंदाजी, पण दिली नाहीत पूर्ण 10 षटके


एकदिवसीय विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. संघाच्या कामगिरीनंतर बाबरच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विश्वचषकानंतर पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बाबरला केवळ कसोटीचा कर्णधार म्हणून ठेवू इच्छित होता आणि ODI-T20 मध्ये ही जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी द्यायची होती. हे पाहून बाबरने स्वतः राजीनामा दिला. आता पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू इफ्तिखार अहमदनेही बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने जे सांगितले, ते यावेळी पाकिस्तानात चर्चेचा विषय बनले आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. शिवाय संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. बाबरने त्याचा योग्य वापर केला नाही, असे इफ्तिखार अहमदने म्हटले आहे. चांगले काम करूनही बाबरने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, असे इफ्तिखारने म्हटले आहे.

इफ्तिखारने म्हटले आहे की तो त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने संघासाठी योगदान देऊ शकतो आणि करू शकतो, परंतु बाबरला त्याच्या गोलंदाजीवर विश्वास नव्हता. एआरवाय न्यूजशी बोलताना इफ्तिखार म्हणाला की बाबरला त्याच्या गोलंदाजीवर विश्वास नव्हता. एकदिवसीय विश्वचषकात तो पाकिस्तानचा सर्वात किफायतशीर गोलंदाज होता, असे इफ्तिखारने सांगितले, पण तरीही कर्णधाराने त्याला फारशी गोलंदाजी दिली नाही. बाबरने पूर्ण 10 षटके टाकू दिली नाहीत, असे इफ्तिखारने म्हटले आहे. इफ्तिखारच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 विकेट आहेत आणि त्याने 5.59 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

इफ्तिकारने असेही सांगितले की आपण या प्रकरणी बाबरशी बोललो होतो आणि त्याला पूर्ण 10 षटके टाकण्यास मागितले होते, परंतु बाबरने तसे केले नाही, कारण त्याचा त्याच्या तज्ञ गोलंदाजांवर विश्वास होता. इफ्तिखारने म्हटले आहे की त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे आणि चांगली कामगिरी केली आहे, परंतु तरीही बाबरचा त्याच्यावर विश्वास नव्हता आणि त्याने आपल्या विशेषज्ञ गोलंदाजांना – शादाब खान, मोहम्मद नवाज यांना प्राधान्य दिले. इफ्तिखारने फर्स्ट क्लासमध्ये 69, लिस्ट-ए मध्ये 58 आणि टी-20 मध्ये 59 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने एकूण 186 विकेट्स घेतल्या आहेत तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 21 विकेट घेतल्या आहेत.