तुरुंगात असताना काय-काय करायचा संजय दत्त, बाहेर आल्यानंतर अनेक वर्षांनी केला खुलासा


चित्रपट अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. यावेळी तो नायक म्हणून नाही, तर खलनायक म्हणून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. KGF 2 आणि शमशेरा सारख्या चित्रपटांनंतर संजय दत्त आता साऊथ स्टार विजय थलापथीच्या लिओ या चित्रपटात खलनायक बनला आहे. या चित्रपटामुळे संजय खूप चर्चेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात असतानाची आठवण सांगितली.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात वापरलेली शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि येरवडा तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. तुरुंगात आपला वेळ कसा घालवला याबद्दल अनेक रंजक गोष्टी खुद्द संजय दत्तने सांगितल्या आहेत.

संजय दत्त म्हणाला, तुम्ही फोटो पाहिल्यास, जेव्हा मी पहिल्यांदा ठाणे तुरुंगात गेलो होतो, तेव्हा अण्णा (सुनील शेट्टी), अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सगळे तिथे आले होते. शिक्षा भोगून मला काही आराम मिळाला नव्हता, मग मी आणखी काय विचार करणार? मला स्वतःला तयार करायचे होते की हो मला जावेच लागेल. मला त्याचा सामना करावा लागेल. सहा वर्षांत, मी त्याचा सामना केला, ते व्यवस्थापित केले, ते वापरले आणि त्यातून शिकलो. संजय दत्तने सांगितले की, आपण तुरुंगात असतानाचा वेळ त्याने स्वयंपाक शिकण्यासाठी वापरला. शास्त्रे वाचली आणि अभ्यास केला. त्याने सांगितले की जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा त्याचे शरीर चांगले झाले होते.

संजय दत्तच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो अखेरचा शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता. याआधी तो शमशेरा, सम्राट पृथ्वीराज, केजीएफ चॅप्टर 2, तुलसीदास ज्युनियर या चित्रपटांमध्ये दिसला होता. आता संजयने दक्षिणेचा रस्ता धरला आहे. लिओ व्यतिरिक्त तो डबल iSmart मध्ये देखील दिसणार आहे. याशिवाय तो हाऊसफुल 5 या मल्टीस्टारर चित्रपटातही दिसणार आहे.