गाडी चालवताना या पाच चुका केल्या तर एअरबॅग देखील शकणार नाही तुमचे प्राण वाचवू


आता लोक नवीन कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्सकडे खूप लक्ष देतात. मागणी लक्षात घेऊन कार कंपन्याही चांगल्या सेफ्टी फीचर्स असलेल्या कार बाजारात आणत आहेत. त्याचवेळी सरकारही या प्रकरणात बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Bharat NCAP मुळे भारतात कार सुरक्षेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर एअरबॅग खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. टक्कर झाल्यास लोकांचे प्राण वाचविण्यात हे मदत करतात. मात्र, जर तुमच्या ड्रायव्हिंगच्या सवयी चांगल्या नसतील तर एअरबॅगदेखील तुमचा जीव वाचवू शकणार नाहीत.

कारमध्ये बसवलेल्या एअरबॅग्जमुळे तुम्हाला सुरक्षित वाटतात. पण आपण काही चुका करतो, ज्यामुळे एअरबॅग उघडत नाहीत. परिणामी एखाद्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला त्या पाच चुका सांगत आहोत, ज्यामुळे तुम्‍हाला अपघात झाल्‍यास एअरबॅगचा फायदा मिळणार नाही. या पाच चुका केल्या, तर पुन्हा अशा चुका न करण्याचा प्रयत्न करा.

लगेच सुधारा या 5 चुका

गाडी चालवताना या पाच चुका पडू शकतात महागात, त्यामुळे लक्षात ठेवा या पाच गोष्टी

  1. सीट बेल्ट: सीट बेल्ट आणि एअरबॅग्स कारमधील प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतात. ही गोष्ट हलक्यात घेतली, तर दुसरी चालणार नाही. कार अपघात किंवा टक्कर झाल्यास या दोन गोष्टी तुमचे संरक्षण करतात. जर तुम्ही सीट बेल्ट घातला नसेल, तर एअरबॅगचाही उपयोग होणार नाही. जर सीट बेल्ट घातला नाही, तर एअरबॅगमुळे जास्त नुकसान होऊ शकते. अपघात झाल्यास जीवही गमवावा लागू शकतो.
  2. शरीराचा काही भाग बाहेर काढणे: कारच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी लोक आपले हात किंवा डोके काचेच्या बाहेर काढतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्हालाही तुमच्या शरीराचा काही भाग गाडीतून बाहेर काढण्याची सवय असेल, तर भविष्यात असे करू नका. डोके किंवा हात बाहेर राहिल्यास एअरबॅग देखील मदत करू शकणार नाही.
  3. मागील सीट बेल्ट न लावणे: फ्रंट सीट बेल्टप्रमाणेच मागील सीट बेल्ट देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जर मागच्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही, तर टक्कर झाल्यास तो दबाव सहन करू शकणार नाही. जोरदार टक्कर झाल्यास, एअरबॅग काम करणार नाहीत, ज्यामुळे जीवितहानी होऊ शकते.
  4. बंपर गार्ड: कार सुरक्षित ठेवण्यासाठी काही लोक कारच्या पुढे बंपर गार्ड वापरतात. यामुळे जास्त नुकसान होऊ शकते. एअरबॅग्स सेन्सरद्वारे काम करतात, परंतु जर बंपर गार्ड असेल, तर एअरबॅग कधी उघडायच्या हे ठरवू शकत नाहीत. या कारणास्तव त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे, आणि यासाठी एक भारी चलन देखील आहे. एअरबॅग्ज व्यवस्थित काम करतात याची खात्री करण्यासाठी, बंपर गार्ड्स बसवू नका.
  5. मद्यपान करून वाहन चालवणे: मद्यपान करून वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला केवळ चलन भरावे लागू शकत नाही, तर तुमचा जीवही गमवावा लागू शकतो. नशेच्या अवस्थेत नियंत्रण नसते, अपघाताचा धोका वाढतो. म्हणून, मद्यपान करून वाहन चालवू नका आणि स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी गाडी चालवण्याच्या चांगल्या सवयी लावा.