Janmashtami 2023 : जन्माष्टमीला काकडीचे महत्त्व काय, त्याशिवाय का अपूर्ण मानली जाते श्रीकृष्णाची पूजा


दरवर्षी असा एक दिवस येतो, जेव्हा प्रत्येकजण लहान मुल बनतो, कारण त्या दिवशी नंदलाल श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. या पवित्र दिवसाला कृष्ण जन्माष्टमी म्हणतात. यंदा जन्माष्टमी 6 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा श्री हरी विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कंसाच्या अत्याचारापासून पृथ्वीवर उपस्थित लोकांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात माता देवकीच्या पोटी झाला. नंदलालचा जन्म रात्री बारा वाजता झाला, त्यामुळे दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला रात्री बारा वाजताच पूजा केली जाते. लड्डू गोपालच्या पूजेमध्ये त्याच्या शृंगाराला खूप महत्त्व आहे. त्यांच्या आनंदासाठी 56 प्रकारचे खाद्यपदार्थही तयार केले जातात. पण काकडीशिवाय भगवान श्रीकृष्णाची पूजा का अपूर्ण मानली जाते, येथे जाणून घ्या.

ज्या पद्धतीने मातेच्या पोटातून मूल जन्माला येते आणि जन्मानंतर त्याची नाळ कापून मातेच्या गर्भाशयापासून वेगळे केले जाते, त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशी काकडीच्या कुशीतून लड्डू गोपालचा जन्म होतो. या दिवशी सकाळपासूनच कृष्णाचे बालस्वरूप लड्डू गोपालही काकडीत ठेवतात. जन्माच्या वेळी काकडी बाहेर काढून जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. काकडीपासून कृष्णाच्या जन्माच्या या प्रक्रियेला नाळ छेदन म्हणतात.

जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री 12:00 वाजता नंदलालचा जन्म झाला, म्हणून मध्यरात्री 12 वाजता काकडीचे देठ एका नाण्याने कापून कान्हाला जन्म दिला जोतो. या पद्धतीनंतर शंख फुंकून कान्हाचे स्वागत केले जाते आणि उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक श्रीकृष्णाची पूजा करावी आणि भोगामध्ये पंजिरी व चरणामृतासह काकडी अर्पण करावी.

जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापून श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या प्रक्रियेला नाळ छेदन म्हणतात. या दिवशी पूजेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ काकडी ठेवून रात्री ठीक 12 वाजता काकडी आणि देठ एका नाण्याने मधूनमधून कापून घ्या. या प्रक्रियेने बाल कृष्णाची नाळ टोचली पाहिजे.

जन्माष्टमीला कान्हाला काकडी जरूर अर्पण करावी. अशी मान्यता आहे की काकडी अर्पण केल्याने भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्या काकडीने नंदलालची नाळ टोचली होती, ती काकडी गरोदर स्त्रीला खाऊ घातली तर श्रीकृष्णाप्रमाणेच खोडकर मूल जन्माला येते, असे मानले जाते.