Monsoon Disease : पावसाळ्यात आजार दूर राहतील! या 4 सवयी अवश्य पाळा


पावसाळा हा वर्षातील सर्व ऋतूंमध्ये सर्वात सुंदर मानला जातो. सुंदर असण्यासोबतच पावसाळा काही आव्हानेही घेऊन येतो. या पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दी अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

हवेतील आर्द्रतेमुळे संसर्ग लवकर होतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे या ऋतूत शरीरातील चयापचय क्रिया वाढवण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरते. पण आपल्या रोजच्या काही सवयी बदलूनही पावसाळ्यात होणारे आजार टाळता येतात.

पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी जरूर घ्या. आपले हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवून चांगली स्वच्छता राखा. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी घाणेरड्या हातांनी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळण्याचा प्रयत्न करा.

पाण्यात जास्तीत जास्त जंतू पसरण्याचा धोका असतो. नेहमी फक्त सुरक्षित आणि स्वच्छ पाणी प्या. पावसाळ्यात फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी प्या. रस्त्यावरचे अन्न किंवा दूषित पाण्यात धुतलेल्या कच्च्या भाज्या खाणे टाळा.

पावसाळ्यात जास्त आर्द्रता असल्याने अन्न लवकर खराब होते. म्हणूनच नेहमी ताजे अन्नच खावे. साठवलेले किंवा शिळे अन्न खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. खाण्याआधी फळे किंवा भाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. त्यांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारखे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छरदाणीखाली झोपण्याचा प्रयत्न करा. याशिवाय आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नका.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही