Rohit-Virat Career : रोहित शर्मा आणि विराट कोहलीची T20 कारकीर्द संपुष्टात, सलग चौथ्या मालिकेत मिळाला मोठा इशारा!


रोहित शर्माची T20 कारकीर्द संपली का? विराट कोहली भारताकडून टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार नाही का? भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज स्टार्सनी त्यांचे शेवटचा T20 सामना खेळला आहे का? हे सर्व प्रश्न विचारण्यामागचे कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आलेल्या संघात या दोघांची नावे नाहीत आणि, हे पहिल्यांदाच घडले नसून, सलग चौथ्या टी-20 मालिकेतील हे वास्तव आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. दोघेही तेथे प्रथम कसोटी आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. पण येथे 5 जुलैला वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली, तेव्हा त्यात ना रोहितचे नाव होते ना विराटचे. अशा परिस्थितीत रोहितकडून टी-20 कर्णधारपद तसेच खेळाडू म्हणून या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. T20 विश्वचषक 2024 डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ व्यवस्थापन रोहित-विराटच्या पलीकडे पाहत आहे का?

प्रत्येक टी-20 मालिकेनंतर पाहायला मिळणारा भारतीय संघ पाहून सध्यातरी असेच वाटते. रोहित-विराटची टी-20साठी निवड न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. T20 विश्वचषक 2022 पासून, सलग चौथ्या मालिकेत हे घडले आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 संघात स्थान न मिळण्यापूर्वी रोहित-विराटला गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यासाठीही टी-20 संघाबाहेर ठेवण्यात आले होते. यानंतर जेव्हा टीम इंडियाची या वर्षी श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या होम टी-20 मालिकेसाठी निवड झाली, तेव्हा त्यावेळीही रोहित-विराटचे नाव गायब राहिले. आता हे पुन्हा पुन्हा घडल्यावर प्रश्न निर्माण होतील आणि दोघांची टी-20 कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि, नेमके तसेच होत आहे.

दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आपला शेवटचा टी-20 सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.