15 सामने, 269 धावा… आयपीएलमध्ये घसरतोय रोहित शर्माचा आलेख, 2 वर्षात झाली अशी अवस्था!


रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात विजयाने करता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मुंबईचा 8 विकेट्सने पराभव झाला. यावेळीही पुन्हा एकदा रोहितची बॅटही शांत राहिली. त्याला केवळ 1 धाव करता आली. तसेच 1 धावासाठी 10 चेंडूंचा सामना केला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांचा आलेख गेल्या काही काळापासून घसरत आहे.

2020 मध्ये मुंबईने 5 व्यांदा विजेतेपद पटकावले. त्याच्या पुढच्या हंगामात, मुंबई लीग टप्प्यात 5 व्या स्थानावर होती आणि नंतर 2022 मध्ये, ते शेवटच्या 10 व्या स्थानावर होते. गेल्या 2 हंगामात मुंबईचा आलेख घसरला आणि रोहितची आयपीएलमधील कामगिरीही घसरायला लागली. आयपीएलच्या शेवटच्या 15 डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून केवळ 269 धावा निघाल्या. 15 डावांपैकी 14 डाव मागील हंगामातील आहेत आणि एक डाव या हंगामातील आहे. यादरम्यान त्याची सरासरी 17.93 आणि स्ट्राइक रेट 115.4 होता.

रोहितची गेल्या 15 डावातील सर्वोत्तम खेळी 48 धावांची होती, म्हणजेच त्याला अर्धशतकही करता आले नाही. आयपीएलमधील शेवटचे अर्धशतक 2021 मध्ये त्याच्या बॅटने झळकावले. 2021 मध्ये त्याने 13 सामन्यात 381 धावा केल्या आणि अर्धशतक झळकावले. यापूर्वी 2009 वगळता इतर सर्व मोसमात त्याने 2 किंवा त्याहून अधिक अर्धशतक ठोकले होते. 2009 मध्ये देखील हिटमॅनने 50 धावा फक्त एकदाच ओलांडल्या होत्या, पण 2009 मध्ये त्याने 2010 च्या मोसमात 3 अर्धशतकांसह 16 सामन्यात 404 धावा केल्या होत्या, परंतु आता त्याची कामगिरी सुधारण्याऐवजी खराब होत आहे.

2021 मध्ये, रोहितने किमान एक अर्धशतक झळकावले होते, परंतु 2022 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वात वाईट होता. गेल्या वर्षी त्याला 14 डावात केवळ 268 धावा करता आल्या होत्या आणि आता या मोसमातील पहिल्या सामन्यात तो फ्लॉप झाला. म्हणजेच त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर 15 डाव उलटले आहेत. आयपीएलच्या या मोसमात तो आपला दुष्काळ संपवेल अशी आशा चाहत्यांना आहे, पण रोहितची कामगिरी पाहून सर्वांची निराशा झाली आहे.