IND vs AUS सामन्यावर खलिस्तानची नजर, गरपरवंत सिंगच्या धमकीनंतर वाढवली स्टेडियमची सुरक्षा


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी पूर्ण उत्साहात आहे. दरम्यान, या सामन्याच्यामध्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे, जी खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आहे. वास्तविक, खलिस्तानी दहशतवाद्यांनी या सामन्यावर वाईट नजर टाकली आहे आणि धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलिस्तानी दहशतवादी गुरपरवंत सिंगने धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत.

या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरपरवंत सिंगने सामना बिघडवण्याची धमकी दिली आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या तपासात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील आवाज दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचा असल्याचे समोर आले आहे. या धमकीनंतर दोन्ही संघ आणि स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

वास्तविक ISIS खलिस्तानी दहशतवाद्यांना सपोर्ट करते. ISIS च्या विचारसरणीने प्रेरित झालेल्या लोकांनाही सौराष्ट्रात अटक करण्यात आली आहे. यानंतर गदारोळ झाला. एटीएस, एसओजी आणि क्राइम ब्रँचसह सुरक्षा यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या असून त्यांनी पाळत वाढवली आहे.

चौथ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहमदाबादमध्ये विजय मिळवल्यानंतरच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करता येईल. अहमदाबादमध्ये विजयाची नोंद करण्यासाठी भारताने सर्वस्व पणाला लावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 आणि कॅमेरून ग्रीनने 114 धावा केल्या. आर अश्विनने पहिल्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. या काळात शुभमन गिलने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकले.