विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत रुतुराज गायकवाडने पुन्हा धमाका केला आणि आसामविरुद्धच्या सामन्यात 125 चेंडूत 168 धावा करून बाद झाला. गायकवाडने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. उपांत्यपूर्व फेरीत गायकवाडने एका षटकात 7 षटकार मारले होते आणि 220 धावांची खेळी खेळली होती. आता उपांत्य फेरीतही ऋतुराजच्या बॅटने धुमाकूळ घातला आणि चौकार-षटकारांची बरसात करत त्याने गोलंदाजांचा समाचार घेतला . गायकवाड उपांत्य फेरीत द्विशतक झळकावण्यास हुकले असले तरी त्याच्या या खेळीने चाहत्यांची मनेही जिंकली. गायकवाडने १३३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा करत धमाका केला. गायकवाडनेही ८८ चेंडूत शतक पूर्ण केले.
WATCH – Red-hot @Ruutu1331 smashes another massive ton in the #VijayHazareTrophy 👏👏
📹📹https://t.co/TzsWpaFowa #MAHvASM #VijayHazareTrophy #SF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 30, 2022