जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात असे म्हटले आहे की, उत्पादन क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आणि अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून भारताने अर्थव्यवस्थेत तेजी आणणे अपेक्षित आहे, हे सर्व दशक संपण्यापूर्वी भारतातील विविध घटक आहेत जे 2030 मध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि स्टॉक मार्केट बनवू शकते.
2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार : मॉर्गन स्टॅनली
‘हे भारताचे दशक का…?असे या अहवालाचे शीर्षक (का हे भारताचे दशक आहे), या अहवालामध्ये भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या ट्रेंड आणि धोरणांचा अभ्यास केला गेला आहे . अहवालानुसार, “याचा परिणाम म्हणून भारत जागतिक अर्थव्यवस्थेत सामर्थ्य मिळवत आहे, आणि आमच्या मते हे विशेष बदल केवळ दशकांमध्येच घडतात आणि ते सर्व गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी चांगल्या संधी आहेत…”
लोकसंख्याशास्त्र, डिजिटायझेशन, डिकार्बोनायझेशन आणि डिग्लोबालायझेशन – चार जागतिक ट्रेंड भारताच्या बाजूने जात आहेत, ज्याला नवीन भारत म्हटले जात आहे. अहवालानुसार, दशकाच्या अखेरीस, भारत जगाच्या एकूण विकासाच्या एक पंचमांश आघाडीवर असेल.
