बीसीसीआयला सर्वोच्च दिलासा, गांगुली आणि जय शाह पुढील तीन वर्षे राहू शकतात त्यांच्या पदावर


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. याशिवाय जय शाह पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे सचिव राहतील. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घटनादुरुस्ती करण्यास दिली परवानगी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. त्याचवेळी, सौरव गांगुलीशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह हे पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआय सचिवपदावर विराजमान होऊ शकतात.

जाणार नाही सौरव गांगुली आणि जय शाह यांची खुर्ची
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर आता सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बोर्डाच्या अध्यक्षपदी राहू शकतात. त्याचवेळी जय शाह हे पुढील तीन वर्षांसाठी आपल्या पदावर राहू शकतात.

बीसीसीआयने मांडला होता मंगळवारी हा युक्तिवाद
बीसीसीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला, “सध्याच्या घटनेत कूलिंग ऑफ पीरियडची तरतूद आहे. जर मी राज्य क्रिकेट असोसिएशनचा एका टर्मसाठी आणि बीसीसीआयचा सलग दुसऱ्या टर्मसाठी पदाधिकारी असेन तर मला कूलिंग ऑफ पीरियडमधून जावे लागेल. दोन्ही संस्था वेगळ्या असून त्यांचे नियमही वेगळे आहेत आणि तळागाळातील नेतृत्व तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्याच्या सलग दोन टर्म खूप कमी आहेत.