जामीन मिळाला, पण तुरुंगातच राहणार कमाल आर खान, जाणून घ्या काय आहे प्रकरण


कमाल आर खान उर्फ केआरकेला मंगळवारी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला. केआरकेला वर्सोवा पोलिसांनी विनयभंगाच्या एका प्रकरणात अटक केली होती. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमाल अजूनही तुरुंगातच राहणार आहे. कारण, अक्षय कुमार, चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा आणि इतरांबद्दल त्याच्या कथित अपमानास्पद ट्विटशी संबंधित प्रकरणात KRK ला जामीन मिळालेला नाही.

तुरुंगातून कधी बाहेर येणार केआरके ?
2020 मध्ये दाखल झालेल्या खटल्यातील KRK च्या जामीन याचिकेवर बुधवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली कारण त्याच्या जुन्या ट्विट्सच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने केआरकेला न्यायालयीन कोठडी सुनावली.

KRK कोर्टात काय म्हणाला?
पीटीआयच्या वृत्तानुसार, वर्सोवा पोलिसांनी रविवारी केआरकेला विनयभंग प्रकरणात ताब्यात घेतले आणि त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले. कमालने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात त्याच्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) मधील मजकूर कथित विनयभंगाच्या घटनेशी व्यावहारिकपणे जुळत नाही.

वकील म्हणाले…
तिच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, एफआयआर घटनेच्या 18 महिन्यांनंतर नोंदवण्यात आला आणि तोही पीडितेच्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर. त्याने पुढे असा युक्तिवाद केला की केआरकेविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम जामीनपात्र आहे. न्यायालयाने केआरकेची याचिका मान्य केली. जून 2021 मध्ये 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे KRK विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केआरकेने तिला एका चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्याच्या बहाण्याने वर्सोवा येथील त्याच्या बंगल्यावर बोलावले होते, असा आरोप तक्रारकर्त्याने केला होता.