पोलिसांना मिळालेले 26/11 चे धमकीचे संदेश, वापरण्यात आला हा आयपी अॅड्रेस आणि या देशाचा नंबर


मुंबई : महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांना नुकतीच व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. खरं तर, अलीकडेच मुंबई शहरात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याचा इशारा व्हॉट्सअॅप संदेश पाठवण्यासाठी पाकिस्तानचा इंटरनेट प्रोटोकॉल (IP) अॅड्रेस वापरण्यात आला. दरम्यान, लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मेसेजमध्ये नमूद केलेल्या 10 जणांची नावे आणि मोबाईल क्रमांकाचे गूढ उकलण्याचे काम पुढील काम सुरू आहे. 10 पैकी आठ नावे उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील आहेत, तर इतरांपैकी एक मुझफ्फरनगर, यूपी आणि हरियाणातील आहेत.

पाकिस्तानचा मोबाईल नंबर
मेसेज पाठवणाऱ्याने यूकेस्थित व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित सेवा प्रदात्याला ग्राहकाचे तपशील शेअर करण्याची विनंती केली असली, तरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ज्या मोबाईल क्रमांकावरून हे मेसेज पाठवले गेले होते, तोही पाकिस्तानचा असल्याचे नंतर आढळून आले. लोकांची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी बिजनौर आणि हरियाणाला भेट दिली, परंतु त्यांच्याबद्दल काहीही असामान्य किंवा संशयास्पद आढळले नाही. बिजनौरमध्ये, त्यापैकी फक्त दोघेच एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यापैकी कोणाचाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तपासात समोर आली आहे ही बाब
त्यापैकी एक मोबाईल नंबर विरारचा शोधण्यात आला आणि तो बिजनौर येथील एका २६ वर्षीय तरुणाकडे सापडला. तो न्हावी म्हणून काम करतो आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्या नातेवाईकाकडे राहत होता. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने दावा केला की त्याच्या नंबरचा आधी वकिलाला धमकावण्यासाठी गैरवापर करण्यात आला होता आणि ते त्याच्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. देशभरातील अनेक एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे आणि यूपीचे दहशतवाद विरोधी पथक काही लोकांची चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

असे म्हटले होते धमकीवजा संदेशात
20 ऑगस्ट रोजी वरळी येथील नियंत्रण कक्षातून मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचे संदेश आले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) (गुन्हेगारी धमकी) अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री 10.50 वाजता हिंदीमध्ये संदेश येऊ लागले की 10 भारतीय दहशतवादी कटाचा भाग आहेत आणि 26/11 पेक्षा वाईट काहीतरी करणार आहेत. पाकिस्तानचा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब सारख्या नावांचा उल्लेख केला, ज्याला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.