Reliance AGM Update: Jio दिवाळीपर्यंत देशात सुरू करणार 5G मोबाइल सेवा


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या एजीएमला संबोधित करताना, कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत देशात 5G सेवा सुरू करेल. ते म्हणाले की, पहिली 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमधून सुरू केली जाईल. यानंतर 2023 च्या अखेरीस देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा उपलब्ध होईल.

मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओची 5G सेवा ही खरी 5G सेवा असल्याचे सिद्ध होईल. ते म्हणाले की जिओकडे फक्त 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आहे, जे सर्वत्र कव्हरेज प्रदान करेल. रिलायन्स जिओची 5G सेवा सर्वात परवडणारी असेल, असेही त्यांनी जाहीर केले. अध्यक्षांनी सांगितले की रिलायन्स जिओ 5G सेवांसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये सांगितले की, रिलायन्स जिओचे सध्या सर्वाधिक 421 दशलक्ष मोबाइल ग्राहक आहेत. ते म्हणाले की जिओने सर्वात मजबूत 4G नेटवर्क स्थापित केले आहे. त्यांनी सांगितले की 3 पैकी दोन ग्राहक Jio Fiber चा पर्याय निवडत आहेत. Jio ची 5G देखील सर्वोत्तम सेवा असेल.

मुकेश अंबानी म्हणाले की, फिक्स्ड ब्रॉडबँडमध्ये भारत अजूनही खूप मागे आहे. ते म्हणाले की, फिक्स्ड ब्रँड बँकेच्या बाबतीत जिओ भारताला जगातील पहिल्या 10 देशांमध्ये स्थान देईल. 5G चा ब्रॉडबँड फिक्स्ड ब्रॉडबँडसाठी वापरला जाईल. रिलायन्स जिओ मुंबईत Jio 5G अनुभव केंद्र देखील उघडणार आहे.

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स जिओने 5G हँडसेट बनवण्यासाठी गुगलसोबत करार केला आहे. तसेच क्लाउड सपोर्ट व्यवसायासाठी मायक्रोसॉफ्टशी करार केला आहे. कंपनीने क्वालकॉमसोबतही करार केला आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की Qualcomm 5G पायाभूत सुविधा उभारण्यात जिओला मदत करेल आणि यासाठी रिलायन्स जिओ आणि क्वालकॉमची भागीदारी झाली आहे.

भारताच्या विकासात आहे रिलायन्सचे योगदान
तत्पूर्वी, एजीएमला संबोधित करताना, मुकेश अंबानी यांनी सर्व भागधारक, सहयोगी, अधिकारी आणि भागीदारांचे स्वागत केले आणि सांगितले की हा प्रसंग खूप खास आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 25 वर्षांचे व्हिजन ठरवले आहे. पंचप्राण 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवेल. भारताच्या प्रगतीसाठी आपण यापुढेही योगदान देत राहू, असे ते म्हणाले. $100 अब्ज उलाढाल पार करणारी रिलायन्स ही पहिली कंपनी आहे. रिलायन्सच्या निर्यातीत 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताच्या निर्यातीत रिलायन्सचा वाटा 8.4 टक्के आहे. कंपनी सर्वाधिक कर भरत आहे, तसेच रिलायन्सने 2.32 लाख नोकऱ्या दिल्या आहेत.