Ramayana Quiz : दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा, विजयानंतर दोघांनी सांगितली मोठी गोष्ट


मलप्पुरम – केरळच्या मलप्पुरम येथील दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी रामायण प्रश्नमंजुषा जिंकून देशातील जनतेला चकित केले आहे. दोघांचा विजय हा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. दोघांनी केरळ प्रकाशक डीसी बुक्सने आयोजित केलेली राज्यव्यापी ऑनलाइन रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली आहे. या प्रश्नमंजुषामध्ये 1000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. दोघेही व्हॅलेनचेरी येथील केकेएचएम इस्लामिक आणि कला महाविद्यालयातील वाफी अभ्यासक्रमाचे (इस्लामिक स्टडीज) विद्यार्थी आहेत. Wafi हा इस्लामिक स्टडीजमधील 8 वर्षांचा कार्यक्रम आहे, जो पोस्ट ग्रॅज्युएशन स्तरापर्यंत नेतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्यक्रमात तीन वर्षांचा विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम देखील समाविष्ट आहे. विजेते मोहम्मद जबीर म्हणाला की, डीसी बुक्सच्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून मला या प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती मिळाली आणि त्यासाठी त्याने स्वतःची नोंदणी केली. तसेच प्रश्नमंजुषाबाबत कोणतीही सविस्तर तयारी नसल्याचे त्याने सांगितले.

रामायण-महाभारत देशातील सर्व जनतेने वाचावे : विजेते विद्यार्थी
विजेत्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, देशातील सर्व नागरिकांनी रामायण आणि महाभारत हे महाकाव्य वाचले पाहिजे आणि शिकले पाहिजे, कारण ते देशाच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा भाग आहेत. हे ग्रंथ शिकणे आणि समजून घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मी मानतो. विजेत्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना लहानपणापासून महाकाव्याची माहिती असली, तरी वाफी कोर्सला गेल्यानंतर त्यांनी रामायण आणि हिंदू धर्माचा सखोल अभ्यास केला.

रामायणातून प्रेरणा घ्यावी : विजेते विद्यार्थी
22 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, वडील दशरथ यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रामालाही आपल्या राज्याचा त्याग करावा लागला. सत्तेसाठी अनंत संघर्षाच्या काळात आपण रामासारख्या पात्रांपासून आणि रामायणासारख्या महाकाव्याच्या संदेशातून प्रेरणा घेतली पाहिजे. विजेत्या विद्यार्थ्यांनी सांगितले की सखोल अभ्यासामुळे इतर धर्म आणि या समुदायातील लोकांना अधिक समजून घेण्यास मदत होईल. ते म्हणाले की कोणताही धर्म द्वेषाला प्रोत्साहन देत नाही, तर केवळ शांतता आणि सौहार्दाचा प्रचार करतो.