उद्धव ठाकरेंना अडकवण्याच्या नादात स्वतःच अडकले एकनाथ शिंदे? मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रतीक्षा कालावधी 26 दिवसांसाठी वाढवला


मुंबई – भाजपच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांची सत्ता उलथवून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात सत्ता येऊन एक महिना होत असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सरकार चालवत असले, तरी मंत्रिमंडळाबाबतची स्थिती स्पष्ट नाही. अशा स्थितीत मंत्रिमंडळ कोणत्या फॉर्म्युल्यावर बनणार आणि किती मोठे होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. भाजप आणि शिंदे गटातील किती नेते मंत्री होणार?

महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे. अशा परिस्थितीत घटनात्मकदृष्ट्या केवळ 15 टक्के मंत्री होऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रात फक्त 42 जणांना मंत्री करता येईल. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 40 मंत्र्यांना स्थान आहे, मात्र आता शिंदे सरकार आपल्या मंत्रिमंडळात किती जणांचा समावेश करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच सरकार स्थापन होऊन 26 दिवस झाले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा होती. आता राष्ट्रपतींच्या शपथविधीचा कार्यक्रमही पार पडला आहे. अशा परिस्थितीत आता मंत्रिमंडळ कधी होणार आणि शिंदे-फडणवीस मंत्रिपदाची आपसात कशी वाटणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वास्तविक, एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर छावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता आठ माजी मंत्री आहेत. शिंदे यांच्यासह उद्धव यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नऊ मंत्री होते, त्यात पाच कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश होता. अशा स्थितीत शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 8 नेते अजूनही मंत्री होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या अन्य बंडखोर नेत्यांनाही मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले, जे मंत्री होण्याची वाट पाहत आहेत.