आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवण्याची मागणी, ट्रेंड होत आहे ‘Extend Due Date Immediately’


नवी दिल्ली – आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी आता फक्त 6 दिवस उरले आहेत. यासाठी सरकारने 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. जसजशी शेवटची तारीख जवळ येत आहे, तसतशी ती वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यावेळी ‘Extend Due Date Immediately’ ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे.

गेल्या वर्षीही केला होता प्रचार
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याची मागणी करत करदाते ट्विटरवर त्यांच्या त्रासाची मोजणी करत आहेत. काहीजण आयकर विभागाच्या पोर्टलमधील समस्यांचे कारण देत आहेत, तर काही इतर कारणांसाठी शेवटची तारीख वाढवण्याची विनंती करत आहेत. मागील वर्षी देखील करदात्यांनी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींबाबत ट्विटरवर अशाच प्रकारे प्रचार केला होता.

पोर्टल समस्या तक्रार
सध्या ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या या मागणीबद्दल बोलायचे झाले, तर काही लोकांनी आयटीआर पोर्टलचा स्क्रीनशॉट घेऊन तो शेअर केला आहे आणि पोर्टल पुन्हा डाउन झाल्याचे लिहिले आहे. तर कुणी लिहिले की, विभागाला समस्या सांगितल्यावर आयकर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षीची शेवटची तारीख वाढवल्याचे उदाहरणही करदाते देताना दिसत आहेत.

31 जुलैनंतर आकारला जाईल दंड
आयकर विभाग करदात्यांना त्यांचा आयटीआर भरण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे विभागाकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक, 31 जुलैच्या देय तारखेनंतर आयटीआर दाखल केल्यास, करदात्याला दंड भरावा लागेल. या अंतर्गत तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर दंडाची रक्कम 5,000 रुपये असेल. तर 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपये दंड भरावा लागेल.

तारीख वाढवण्यास विभागाचा नकार
आयकर विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की यावेळी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली जाणार नाही. सोमवारी बिझनेस टुडेशी झालेल्या संभाषणात अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी विभागाच्या आयटीआर पोर्टलवरील अनियमितता तपासण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे. ते म्हणाले की, आयटीआर भरण्याची अंतिम मुदत यावर्षी वाढवता येणार नाही.

तीन कोटींहून अधिक भरले गेले रिटर्न
बिझनेस टुडेच्या अहवालात, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत 3 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर भरला आहे. त्याच वेळी, वीकेंडमध्ये 40 लाख आयटी रिटर्न भरले जातील. ही आकडेवारी पाहता विभागाच्या आवाहनाचा परिणाम करदात्यांच्या मनावर होत असल्याचे म्हणता येईल. आयकर विभागाने करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.