Maharashtra Political Crisis : दोन महिन्यांपूर्वी सुरु झाली होती बंडखोरीची तयारी, त्याकडे दुर्लक्ष राजकीय पेचप्रसंगाचे मुख्य कारण


मुंबई : शिवसेनेत ठाकरे घराण्यापाठोपाठ एकेकाळी ‘नंबर टू’चा दर्जा असलेल्या शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वीच पक्षाविरोधात बंडखोरी सुरू केली होती. महाविकास आघाडीशी संबंधित सूत्रांवर विश्वास ठेवला, तर शिंदे यांनी आघाडीविरोधात आघाडी उघडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष, काही मंत्र्यांचा कामात होणारा हस्तक्षेप, आदित्य ठाकरेंकडे अधिक लक्ष आणि सरकारमध्ये राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व.

खुद्द शिवसेनेच्या काही आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शिंदे गटातील आमदारांनी उद्धव यांच्याकडे अनेकवेळा, विशेषत: कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या कामात ढवळाढवळ करून अडचणी निर्माण केल्याच्या तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

ठाण्यातच कमकुवत होत होती शिवसेना
शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयात शिवसेनेचे दोन मंत्री सातत्याने हस्तक्षेप करत होते. आलम असा होता की, त्यांना त्यांच्या जिल्ह्यात, ठाण्यात एकही अधिकारी बदलता आला नाही. त्यांच्या विभागाची कोणतीही फाईल मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पुढे जाऊ दिली जात नव्हती. सीएमओकडून विभाग सचिवांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. स्वत:कडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून शिंदे यांच्यासह खंती मराठा आमदारांनी एप्रिलमध्ये जमवाजमव सुरू केली. त्यांनीही उद्धव यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली.