35 रुपयांसाठी रेल्वेसोबत पाच वर्षे लढा, आता तीन लाख लोकांना मिळणार अडीच कोटी


कोटा – राजस्थानमधील कोटा येथील एका व्यक्तीला रेल्वेसोबतच्या पाच वर्षांच्या लढाईनंतर 35 रुपयांचा तिकीट परतावा मिळवण्यात यश आले. यासोबतच त्यांनी आपल्या अथक संघर्षातून सुमारे तीन लाख लोकांना अडीच कोटी रुपये मिळवून देण्याचा मार्ग खुला केला.

कोटाचे रहिवासी अभियंता सुजित स्वामी यांनी 50 आरटीआय दाखल केल्यानंतर आणि चार सरकारी विभागांना पत्रे लिहिल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे. आरटीआयच्या उत्तराचा हवाला देऊन ते म्हणाले की, रेल्वेने 2.98 लाख IRCTC वापरकर्त्यांचे 2.43 कोटी रुपये परत केले आहेत.

जीएसटी लागू होण्यापूर्वीच जमा झाला सेवा कर
वास्तविक, हे प्रकरण जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द केल्यानंतरही 35 रुपये सेवा कर आकारण्याशी संबंधित आहे. 30 वर्षीय अभियंत्याच्या म्हणण्यानुसार, त्याने 2 जुलै 2017 रोजी प्रवासासाठी एप्रिलमध्ये कोटा ते नवी दिल्ली हे गोल्डन टेंपल मेलचे तिकीट बुक केले होते. मात्र, नंतर त्यांनी 765 रुपये किमतीचे हे तिकीट रद्द केले, त्यासाठी रेल्वेने 65 ऐवजी 100 रुपये वजा करून 665 रुपयांचा परतावा दिला होता.