भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या? – ओवेसी


नवी दिल्ली – ज्ञानवापी मशीद वादानंतर देशात मुघलकालीन इतिहास आणि मुस्लिमांबाबत वादाला तोंड फुटले आहे. प्रत्येकाचे स्वतःचे हक्क आहेत. केवळ ज्ञानवापीच नाही, तर ताजमहाल आणि कुतुबमिनारबाबतही वाद निर्माण होऊ लागला आहे. त्यांच्या सर्वेक्षणाचीही मागणी होत आहे. दरम्यान, AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांबाबत मोठा दावा केला आहे.

ओवेसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये इतिहास आणि मुघल काळाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही, पण सांगा मुघल बादशहांच्या पत्नी कोण होत्या? त्यांच्या या पोस्टनंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

अशिक्षित संघी समजणार नाहीत
याआधी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्या मदरशासंदर्भातील वक्तव्यावरही ओवेसी यांनी आक्षेप घेतला होता. ओवेसी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर बिस्वा यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, आसाममध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 7 लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, परंतु मुख्यमंत्री अशोभनीय टिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. ते पुढे म्हणाले, जेव्हा संघी ब्रिटीश एजंट म्हणून काम करत होते, तेव्हा मदरसा स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होता. इस्लाम व्यतिरिक्त अनेक मदरसे विज्ञान, गणित आणि सामाजिक अभ्यास शिकवतात.

भारताला मुस्लिमांनी समृद्ध केले
आरएसएसवर हल्ला करताना ओवेसी म्हणाले, शाखांप्रमाणे मदरसे स्वाभिमान आणि सहानुभूती शिकवतात, परंतु अशिक्षित संघी हे समजणार नाहीत. हिंदू समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांनी मदरशात शिक्षण का घेतले, असा सवाल त्यांनी केला. मुस्लीम वंशाकडे लक्ष दिल्याने तुमचा न्यूनगंड दिसून येतो. मुस्लिमांनी भारताला समृद्ध केले आहे आणि ते पुढेही करत राहतील.