लंडनमध्ये राहुल गांधी म्हणाले – भारताची स्थिती अद्याप चांगली नाही, भाजपने सर्वत्र शिंपडले आहे रॉकेल


लंडन – काँग्रेस नेते राहुल गांधी आयडियाज फॉर इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आहेत. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी एक मुलाखतही दिली, ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल करताना काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यांनी सांगितले की काँग्रेस का हरत आहे आणि भाजप प्रत्येक निवडणुकीत का यशस्वी होत आहे?

भाजपने देशभर शिंपडले रॉकेल : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, सध्या भारताची स्थिती चांगली नाही. भाजपने देशभर रॉकेल शिंपडले आहे. त्यांना एक ठिणगी हवी आहे आणि तुम्ही मोठ्या संकटात पडला. लोकांना, समाजाला, राज्यांना आणि धर्मांना एकत्र आणणे ही विरोधी पक्षाची, अगदी काँग्रेसचीही जबाबदारी आहे, असे मला वाटते. आपल्याला या तापमानाला थंड करणे आवश्यक आहे, कारण हे तापमान थंड केले नाही, तर गोष्टी चुकीच्या होऊ शकतात.

राहुल यांनी सांगितले काँग्रेसच्या पराभवाचे कारण
कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना विचारण्यात आले की, भाजप निवडणूक का जिंकत आहे? काँग्रेस का हरत आहे? तर प्रत्युत्तरात राहुल म्हणाले की, ध्रुवीकरण आणि एकूण मीडिया वर्चस्वाचा भाजपला फायदा झाला आहे. शिवाय आरएसएसने एक रचना तयार केली आहे, जी मोठ्या प्रमाणावर घुसली आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने अशी चौकट तयार करण्याची गरज आहे. राहुल म्हणाले की, भाजपला मत न देणाऱ्या 60-70% लोकांपर्यंत आम्हांला अधिक आक्रमकपणे जाण्याची गरज आहे आणि आम्ही ते एकत्र केले पाहिजे.

ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर होणारे हल्ले भारतातील जनता पाहत असल्याचे राहुल म्हणाले. या संस्था आता डीप स्टेटच्या ताब्यात आहेत. सीताराम येचुरी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, आरजेडी नेते तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह अनेक विरोधी नेते राहुल यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत.