राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ : औरंगाबाद सभेबाबत गुन्हा दाखल, सलोखा बिघडवणाऱ्यांना डीजीपींचा इशारा


मुंबई – महाराष्ट्रातील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा आणि ते न काढल्यास ४ मेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी मंगळवारी ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. तत्पूर्वी, राज्याचे डीजीपी रजनीश सेठ यांनी सलोखा बिघडवणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला. महाराष्ट्र पोलीस कारवाई करण्यास सक्षम आहेत.

ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभेला संबोधित केले होते. रॅलीचा व्हिडिओ पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रॅलीच्या इतर आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी आज डीजीपी सेठ म्हणाले की, राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्याची तेथील पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत. ते आवश्यक कायदेशीर कारवाई करतील. औरंगाबादचे पोलिस आयुक्त कोणावरही कारवाई करण्यास सक्षम आहेत. सभेच्या व्हिडिओमध्ये ठाकरे काही चुकीचे बोलत असल्याचे आढळून आल्यास आज कारवाई केली जाईल.

इतर राज्यातील लोक येऊन उपद्रव घडवू शकतात: गुप्तचर अहवाल
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या गृह विभागाने म्हटले आहे की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातून लोक येथे येऊ शकतात, असा गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. डीजीपी सेठ यांनी मंगळवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरेंच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने या दोघांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर डीजीपी म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कोणतेही आव्हान हाताळण्यास सक्षम आहेत. राज्यभर एसआरपीएफ, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

ठाकरे यांनी औरंगाबादेत दिला होता इशारा
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले की, मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी आम्ही 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता, पण 3 मे ला ईद आहे. मला उत्सव खराब करायचा नाही. सरकारने आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा 4 मे नंतर आम्ही कोणाचेही ऐकणार नाही, अशी आमची विनंती आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही मशिदींसमोर दुहेरी ताकदीने हनुमान चालिसाचे पठण करू, असे मनसे प्रमुख म्हणाले. आमची विनंती समजली नाही, तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने हाताळू.