मुंबई – महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांना आज पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष पीएमएलए कोर्टाने १८ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.
त्याचबरोबर, न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांना घरचे जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी दिली गेली आहे. मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता दाऊद टोळीकडून बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.