नीरज चोप्रा, रवि दहियासह पहिल्यांदाच ११ खेळाडूंना मिळणार खेलरत्न पुरस्कार


नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अ‍ॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह टोकियो लिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचेही नावे आहे. खेलरत्न पुरस्कार पहिल्यांदाच ११ खेळाडूंना मिळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा,क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवि दहिया, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनि लेखरा, कृष्णा नगर आणि एम नारवाल यांच्या नावाचा समावेश आहे.

यंदा खेलरत्न पुरस्काराची घोषणा ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमुळे लांबणीवर पडली होती. ५ खेळाडूंना या पुरस्काराने गेल्या वर्षी सन्मानित करण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव मोठे करणाऱ्या ४ पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. तर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या ५ खेळाडूंचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी गठित केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जून पुरस्कारांची घोषणा केली आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय सैन्य अधिकारी २३ वर्षीय नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकत देशाला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तर टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिने इतिहास रचत वैयक्तिक दुसरे पदक पटकावले आहे. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकत तिने इतिहास रचला आहे.