अंदमान तुरुंगात कैदेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून ब्रिटीशांकडे केली होती दया याचिका : राजनाथ सिंह


मुंबई : ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले. त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर अनेक दया याचिका दाखल केल्या असे वारंवार म्हटले गेले. पण महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैदेत असताना हिंदुत्वाचे आयकॉन वीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली, असे म्हटले आहे. त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान विशिष्ट विचारसरणीचे पालन करणाऱ्यांनी बदनाम केले आणि ते आता सहन करणार नसल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले. तुमच्यात मतभेद असू शकतात, पण त्याला निंदनीयपणे पाहणे योग्य नाही. त्यांच्या राष्ट्रीय योगदानाची अवहेलना करण्याची कृती खपवून घेतली जाणार नाही, असे सिंह म्हणाले. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.

पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, सावरकरांच्या विरोधात खूप काही खोटे बोलले गेले. त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर अनेक दया याचिका दाखल केल्या, असे वारंवार म्हटले गेला. पण सत्य हे आहे की त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नव्हत्या. सामान्यत: दया याचिका दाखल करण्याचा कैद्याला अधिकार असतो. दया याचिका दाखल करण्यास महात्मा गांधींनी सांगितले होते. त्यांनी गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली आणि महात्मा गांधींनी सावरकरजींची सुटका करावी, असे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, की आम्ही स्वातंत्र्यासाठी ज्या प्रकारे शांततेने आंदोलन चालवत आहोत, तसे सावरकरही करतील, असे सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की, गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी सावरकरांनी लोकांना प्रेरित केले आणि स्त्रियांच्या हक्कांसह इतर विविध सामाजिक समस्यांमध्ये अस्पृश्यतेविरोधात आंदोलन केले. पण, त्यांच्या योगदानाकडे देशाच्या सांस्कृतिक एकतेमध्ये दुर्लक्ष करण्यात आले. 2003 मध्ये जेव्हा संसदेत सावरकरांचे चित्र लावले जात होते, तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला होता, तर सरकार बदलल्यावर अंदमान आणि निकोबार तुरुंगात त्यांच्या नावाचा फलक काढला गेला होता, असे ते म्हणाले. सिंह म्हणाले की सावरकरांची कथा प्रमाणित विचारधारेचे पालन करणाऱ्यांनी सांगितली आहे.