सरकारच्या एअरलाईन्स कपंन्यांना खासदारांसाठी असलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना


नवी दिल्ली – आता नवीन मालक ‘एअर इंडिया’ला मिळाला असून टाटा समूहाने सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुंतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यामुळे एअर इंडिया खाजगी हातात गेली असली तरी महाराजासारख्या प्रवासातील मान्यवरांना वागवण्याच्या प्रथेला टाटा म्हणणे शक्य होणार नाही. दरम्यान सर्व एअरलाईन्स, विमानतळ ऑपरेटर आणि विमान सुरक्षा नियामक यांना विमानतळांवर संसद सदस्यांना (खासदार) प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

भारत सरकारने एअरलाईन उद्योग आता खाजगी केले आहे. त्यानंतर हवाई बंदरांची संख्याही वाढवली जाईल. तर व्हीआयपी संस्कृती अजूनही अबाधित राहील. केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने २१ सप्टेंबर रोजी एक पत्र जारी केले होते, ज्यात विमान कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे सुनिश्चित केले होते.

२१ सप्टेंबर २०२१ रोजी लिहिलेल्या पत्रात केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे की, विमानतळांवर खासदारांना प्रोटोकॉल, समर्थन वाढवण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या गेल्या आहेत. दरम्यान याबाबत विमानतळांवर निष्काळजीपणाचे काही मुद्दे लक्षात आले असल्यामुळे सर्व संबंधितांना विनंती आहे की त्यांनी संसदेतील सदस्यांसाठी प्रोटोकॉचे पालन करावे.

अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी मंडळ विमान प्रवासादरम्यान खात्री करण्यासाठी मंत्र्यांसह सामान्य प्रवाशांप्रमाणे सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभे करतात. परंतु मंत्रालयाला अनेकदा खासदारांकडून तक्रारी येतात की त्यांना प्रवासादरम्यान कमी लेखले जाते.