मुंबई – पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर भाजप आमदार नितशे राणे यांनी निशाणा साधला आहे. काल भाजपकडून मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांवर दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. त्यावर, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दोन दिवसांत लोकल संदर्भात निर्णय होईल, अशी माहिती दिली होती. यावरून आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का? असा सवाल केला आहे.
2 दिवसात लोकल चालू ..
17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..
मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???
हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ??
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!— nitesh rane (@NiteshNRane) August 7, 2021
दोन दिवसात लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला असल्याचे ट्विट करत भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.
हिंदू समाज.. हिंदू सण.. हिंदू संस्कृती वर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत.
आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने..
असंख्या घटना कानावर येत आहेत.. पश्चिम बंगाल सारखा मुंबईत राहणारा "हिंदू खतरे में है" असं सांगण्याची वेळ आली आहे!!!— nitesh rane (@NiteshNRane) August 6, 2021
तसेच, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असे सांगण्याची वेळ आल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.