काल दिवसभरात देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद; एकट्या केरळमध्ये 50 टक्के रुग्ण


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42,625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 562 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल केरळमध्ये सर्वाधिक 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये केरळमध्ये वाढ झाली आहे. काल दिवसभरात 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34.49 लाख झाली आहे. केरळमध्ये सलग सहाव्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 17 लाख 69 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात विशेष म्हणजे, 3 कोटी 9 लाख 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 10 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 6005 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 15,552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल (मंगळवार) नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

गेल्या 24 तासात 288 कोरोनाबाधितांची मुंबईत नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे.