देशात 40 हजारांहून अधिक बाधितांची नोंद, तर केरळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून मागील सलग सहा दिवसांपासून देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 40,134 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 422 रुग्णांनी जीव गमावला आहे. काल (रविवारी) केरळमध्ये सर्वाधिक 20,728 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात काल दिवसभरात 36,946 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत केरळमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सलग सहाव्या दिवशी केरळमध्ये 20 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये 20,728 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 34,11,489 वर पोहोचली आहे.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी 16 लाख 95 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 24 हजार 773 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 3 कोटी 8 लाख 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोनाची लागण झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 13 हजार 718 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात काल 6,479 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 94 हजार 896 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के झाले आहे.

काल राज्यात कोरोनामुळे 157 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 78 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (8), हिंगोली (74), अमरावती (82) वाशिम (88), गोंदिया (98), गडचिरोली (15) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 15,680 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 3 लाख 98 हजार 100 वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर पोहोचली आहे. तर महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 वर पोहोचला आहे.