देशाचे नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच नुकसान; राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची टीका


मुंबई – पंडित जवाहरलाल नेहरुंच्या शांतीदूत धोरणामुळेच देश कमकुवत झाला आणि खूप वेळापर्यंत हे सुरुच होते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. भगतसिंह कोश्यारी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतरजण उपस्थित होते.

अटलबिहारी यांचा कार्यकाळ सोडून दिला, तर त्याआधी वाटले की देशाच्या सुरक्षेबाबत लोकांचे लक्ष खूप कमी आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंचा मी खूप आदर करतो. पण कदाचित त्यांची कमजोरी होती की त्यांना वाटयचे की शांतीदूत बनावे, कबूतरे उडवावी. यामुळे देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुच होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ मध्ये अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षापासून तसाच ठेवला होता. सरकार घाबरायचे पण आमच्या वाजपेयीजींनी चाचणी घडवून आणली. आपल्यावर जगाने निर्बंध आणले, पण अटलजींना आपल्या देशातील नागरिकांवर विश्वास होता. मी आपल्या सैनिकांदेखील सांगतो, जसा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तसाच तुम्हालाही आमच्यावर विश्वास असायला हवा की देश तुमच्यासोबत आहे, असे राज्यपालांनी यावेळी म्हटले.

आपल्याला देशात शांततेचे वातावरण हवे आहे. आपण कोणालाही शत्रू मानत नाही. दुसरीकडे आपल्याला शत्रू माननाऱ्या लोकांनी ४ बाजूंनी आपण घेरले गेलो असल्याचेही राज्यपाल म्हणाले. त्रिशूलमध्ये असताना विमानतळ सुरु नसल्याचे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. पण कालपरवा बातमीतपत्रात पाहिले की लडाखमध्ये ४ विमानतळे उभी राहत आहे. मला वाटले की मला पद्मविभूषण मिळत आहे. कारण सीमेवर हे गरजेचे आहे. हे एवढे वर्ष झाले नाही पण आता मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याचे राज्यपाल म्हणाले.